Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»सॉमरसेट मॉम अन् शंकर पाटलांचा ‘पाऊस’!
    ललित

    सॉमरसेट मॉम अन् शंकर पाटलांचा ‘पाऊस’!

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 30, 2025Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, पुस्तक वाचन, सॉमरसेट मॉम, शंकर पाटील, पाऊस, रेन, मानवी भावना
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    डॉ. अस्मिता हवालदार

    पाऊस म्हटल्यावर मला सॉमरसेट मॉमची ‘Rain’ ही कथा आठवते आणि दुसरी शंकर पाटील यांची ‘वळीव’. गेले दोन-तीन दिवस पाऊस पडतोय. पावसाळी वातावरण झालंय… हलका गारवा आला आहे. रस्त्यावर पाणी साचल्यावर प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या चिंता आहेत. छत्री किती दिवस सोबत ठेवायची? कपड्यांवर चिखल उडेल… गाडी खराब होईल… घरात चिखलाचे पाय येतील… कपडे वाळणार नाहीत… आज ट्रॅफिक जॅम होईल… अशा अनेक. यातल्या सर्व किंवा बऱ्याचशा माझ्याही मनात आहेत. विचारचक्र सुरू झालंय. घरी खिडकीत पाऊस enjoy करत नुसते बसून रहाण्याचे आता दिवस नाहीत.

    तर ‘रेन’ आणि ‘वळीव’ कथांबद्दल.

    ‘रेन’ कथा प्रशांत महासागरातल्या एक बेटावर घडते. लहानशा बेटावर भरपूर, सतत मुसळधार पाऊस पडत असतो. इतका की, अनेक दिवस पाऊस थांबत नाही. दररोज पावसाळी हवा, सर्द वातावरण, आर्द्रता… बेटाच्या विशिष्ट आकारामुळे पाऊस आकर्षित होतो, असे लेखक म्हणतो. एकदा या Pego Pego बेटावर बोटीने प्रवास करणारे प्रवासी हवामानामुळे पुढे Apia ला जाणे शक्य नसल्याने काही दिवसांसाठी राहू लागतात… न पेक्षा त्यांना राहावे लागते. बोटीवर इथले स्थायिक मिशनरी, एक डॉक्टर जोडपे, एक वेश्या आणि इतर असतात…

    हेही वाचा – बोल माधवी… मनात चाललेले महाभारत!

    मिशनरी इथल्या लोकांना सद्वर्तन करण्याचे धडे द्यायला लागतो. हवामानाला अनुसरून इतरांचे असलेले कपडे त्याला अश्लील वाटत असतात म्हणून अंगभर कपडे घालायला भाग पाडतो. त्याच्या विरुद्ध जायची कुणाची हिंमत नसल्याने लोक त्याचे वागणे सहन करत असतात. डॉक्टर जोडप्याला त्याचे वागणे आवडत नाही, पण तेही विरोध करत नाहीत. सगळे प्रवासी एका इमारतीच्या खोल्यांत राहू लागतात. वेश्येकडे खलाशी येऊन नाचगाणी करतात याचा मिशनऱ्याला राग येतो. तो तिला सांगून पाहतो पण ती मिशनऱ्याचे ऐकत नाही. तिला याच बेटावर राहायचे असते, कारण तिच्यावर गुन्ह्याचा आरोप असतो आणि पुढच्या बेटावरचे पोलीस तुरुंगात टाकण्यासाठी तिची वाट पाहत असतात.

    तर, मिशनरी आपले राजकीय वजन वापरून तिला बेटावर राहू न देण्याची आणि पुढे पाठवून देण्याची व्यवस्था करू लागतो. ती विनवण्या करते, खलाशांना येऊ देत नाही, नाचगाणी बंद करते… पण तो ऐकत नाही. तिला Apia वर पाठवण्यापूर्वीच्या रात्री मिशनरी रात्री तिला भेटायला जातो, पापक्षालन करण्यासाठी काही वाचून दाखवतो… तिचे पापी मन आता शुद्ध झाले आहे… तिचा पुनर्जन्म झाला आहे, असे म्हणतो. सकाळी त्याचे प्रेत समुद्र किनारी सापडते. त्याने आत्महत्या केलेली असते. वेश्येकडे पुन्हा खलाशी येऊ लागतात, नाचगाणे सुरू होते. स्थानिक लोक पुन्हा पहिल्यासारखा पोशाख करू लागतात आणि डॉक्टर, सरकारी अधिकारी अचंबित होतात.

    हेही वाचा – युगांत : इरावतीबाईंचा संशोधनात्मक निबंध

    मुसळधार पाऊस असल्यामुळे एका बेटावर घडलेले कथानक माणसाच्या खऱ्या रूपावर आणि दिखाव्यावर भाष्य करते. ही दीर्घकथा आहे जिचे नायक-नायिका मिशनरी आणि वेश्या असले तरी एका अर्थाने पाऊस सुद्धा आहे. शेवट धक्कादायक आहे. कथा संपल्यावर सुन्न होतो. नैसर्गिक भावनांना कोणीही आवर घालू शकत नाही. केवळ स्वतःची फसवणूक करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असतो, हे लेखकाने मांडले आहे. कथेच्या शेवटी वेश्या म्हणते, “You men, you are all the same, all of you.”

    दुसरी कथा ‘वळीव’. पावसाची चिन्हं दिसत असताना म्हातारा शेतकरी शेतात बसलेला असतो. खूप उकडत असते. आर्द्रता वाढलेली असल्याने चिकट घाम येत असतो. विजा चमकू लागल्यावर तो चिंतेत पडतो. पायाळू असल्याने त्याला विजेपासून धोका आहे, अशी त्याची समजूत असते. त्यावर उपाय म्हणून घातलेली तांब्याची अंगठी घरी राहाते. आता घरी कसे जायचे, या चिंतेत तो असतो… इतक्यात त्याची बायको अंगठी कोणाबरोबर तरी त्याच्याकडे पाठवते आणि वळवाचा पाऊस सुरू होतो. ‘वळवाचा पाऊस’ हे रूपक लेखकाने वापरले आहे. कथेचे शेवटचे वाक्य – ‘तो अंगठीकडे म्हऊ घातल्यागत बघतच बसला…’ किती सुंदर लिहिले आहे. त्याचे आणि पत्नीचे प्रेम तिच्या अंगठी पाठवण्यातून व्यक्त होते. त्याच्या मनात सुरू असलेली आंदोलनं थांबतात. पाऊस पडल्यावर धरती मोहरते तसा तो पत्नीच्या प्रेमामुळे मोहरुन जातो.

    पावसावर कथा, कविता, ललित लेखनाचा साहित्यात अक्षरशः पाऊस पडलेला आहे. पण माझ्या लक्षात राहिलेल्या या दोन कथा…

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn