Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»बनगरवाडी… लहानसे खेडं पूर्ण विश्वाचे प्रतिनिधी
    ललित

    बनगरवाडी… लहानसे खेडं पूर्ण विश्वाचे प्रतिनिधी

    डॉ. अस्मिता हवालदारBy डॉ. अस्मिता हवालदारOctober 28, 2025Updated:March 17, 20261 Comment3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, पुस्तक वाचन, पुस्तकसंग्रह, बनगरवाडी, विश्वाचे प्रतिनिधित्व, राजाराम सौन्दणीकर, सौन्दणीकर मास्तर,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आपल्या आवडत्या पुस्तकांची यादी वयानुसार बदलत असते. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी पुस्तकं आवडत असतात. बनगरवाडी ही व्यंकटेश माडगूळकरांची कादंबरी मी पंधरा – सोळा वर्षाची असताना वाचली असेन… कदाचित आधीच! तेव्हापासून आजपर्यंत माझं सर्वात आवडतं पुस्तक तेच राहिलं आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमाकांची पुस्तकं मात्र दर दोन-तीन वर्षांनी बदलत राहिली, पण बनगरवाडीने मला भुरळ घातली होती. वाचल्यावर लगेच मला ती आवडली होती आणि बाबांना मी तसं म्हटलंही… तेव्हा त्यांनी, ‘कादंबरीत काय वाचायचं, हा लेखक समर्थ कसा…’ हे समजावून सांगितलं आणि मग तर ती मनातून हृदयात जाऊन बसली. व्यंकटेश माडगूळकरांनी स्वत:च प्रस्तावनेत लिहून ठेवलंय की, वेलीला कलिंगड यावे, तशी ही कादंबरी उतरली आहे.

    पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत हे पुस्तक नीट पाहायला, वाचायला हवं. मुखपृष्ठ पाहून मनात प्रतिमा निर्माण होते. माडगूळ या लेखकाच्या गावाजवळ लेंगरवाडी नावाची वाडी होती. त्यावरून त्यांना ही कादंबरी स्फुरली.

    राजाराम सौन्दणीकर नावाचा पोरगेलासा मुलगा बनगरवाडी या लहानशा साधारण पस्तीस उंबरे असलेल्या खेड्यात मास्तरची सरकारी नोकरी करायला जातो. त्याच्या घरापासून इथे पोहोचायला चालत जावे लागते… अन्य कोठलेही साधन नव्हते. कादंबरीची सुरवात तो तांबडे फुटायच्या आधी चालत वाडीला निघाला आहे… इथपासून होते. लेखक निसर्गाचे वर्णन करतो. मुरमुटीची पाने, किडे, पक्षी, कोंबड्या, झाडे, रस्ता, धूळ आणि आकाशात होणारे रंगनाट्य, त्यातून प्रवेश करणारा सूर्य… अशा वर्णनातून लेखक आपल्याला त्या वातावरणात नेतो. आपण नकळत रंग, स्पर्श, गंध, रस, ध्वनी या पाच तन्मात्रांचा अनुभव घेतो. वाडीला पोहोचेपर्यंत दुपार झालेली असते. दमलेला हा मुलगा पारावार बसतो आणि पहिलाच माणूस जो भेटतो तो त्याला, ‘तू अंडीवाला आहेस का?’ असे विचारतो. वाडीच्या विश्वाशी त्याची ओळख व्हायला इथे सुरवात होते.

    हेही वाचा – जापनीज वाइफ… अजब प्रेम की गजब कहानी!

    कादंबरीत अनेक पात्र आहेत. म्हातारा कारभारी, त्याची मुलगी अंजी, शेकू, शेकूची कष्टाळू बायको, बालटया, आयबू मुलाणी, आनंदा रामोशी, काकुबा, वांगीची बाई, जगन्या, रामा बनगर या पात्रांतून लेखकाने धनगरांचे विश्व उभे केले आहे. कमी पावसाचा प्रदेश असल्यामुळे पावसाचे दुर्भिक्ष्य, दारिद्र्य ही मुख्य आव्हाने. पाऊस पडल्यावर शेती होते, सुगी येते, थोडी संपन्नता येते. मेंढ्या पाळणे असतेच. मेंढी पाळणाऱ्या समाजाची जीवन पद्धती आपल्यासाठी नवी असते. कितीतरी वेळा असेही जीवन असते, असे वाटून जाते. हा पोरगेला मास्तर गावात सर्वांचे काम करत असतो. पत्रे लिहिणे, पोस्टात टाकणे, चांदीचे रुपये खुले करून आणणे वगैरे. एकदा अशीच रुपयाची मोड चोरीला गेल्याने तो संकटात सापडतो…

    तो गावकऱ्यांना प्रोत्साहन देऊन तालीम बांधतो, उद्घाटनाला पंत सरकारला बोलावतो. हा या कादंबरीचा उत्कर्ष बिंदू… यानंतर दुष्काळ पडतो. अन्नपाणी मिळेनासे होते. मेंढरे मरायला लागतात. लेखक लिहितो, ‘माणसे ‘जगायला’ बाहेर जाऊ लागली…’ हे वर्णन अक्षरशः अंगावर येते. माणसाच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू राग, लोभ, मत्सर, द्वेष, ममता, मोह, वासना, कनवाळूपणा दिसत राहतात. जगात कुठेही जा, परिस्थिती कशीही असू दे माणूस एकसारखाच असतो!

    हेही वाचा – थँक यू मि. ग्लाड… क्रूरकर्म्याची हतबलता

    हे लहानसे खेडं पूर्ण विश्वाचे प्रतिनिधी आहे, असे वाटते. कादंबरीत आपण इतके रंगून जातो की, त्यांची सुखदु:ख आपली वाटू लागतात. स्वत:चे मरण ओळखणारा कारभारी, बैलाच्या जागी स्वतःला जुंपून घेणारी शेकूची बायको, मेंढरांच्या पिल्लांचे आई-वडील ओळखणारा काकूबा, पैसे चोरून पुन्हा परत आणून देणारा आनंदा ही सगळी पात्र आपलीशी वाटू लागतात. माडगूळकरांची अतिशय सोपी भाषा, एकही संस्कृतप्रचुर शब्द नाही, मोठमोठी वाक्य नाहीत, तत्वज्ञान सांगण्याचा आव नाही… तरीही जगण्याचा अर्थ समजून येईल, असे लेखन! त्यांची साधी भाषा मोहक आहे. शब्दांचा चपखल वापर… तगार, गहिवर या शब्दांचा वेगळा वापर… भाषा किती समृद्ध आहे, याची जाणीव करून देतात.

    या कादंबरीवरचा सिनेमा पाहिला. जसे दा विंची कोड किंवा गोन विथ द विंड कादंबऱ्या वाचल्यावर सिनेमा फिका वाटला, तसेच काहीसे झाले. दिग्दर्शकाने पूर्ण प्रयत्न केले असूनही कादंबरी वाचताना आपल्या मनात ज्या प्रतिमा तयार झालेल्या असतात, त्या पात्रांशी जे भावनिक बंध झालेले असतात तसे सिनेमात दिसत नाहीत. म्हणून बनगरवाडी कादंबरी वाचायला हवी. माझ्यासाठी अजूनपर्यंत बनगरवाडीची जागा इतर कुठल्या पुस्तकाने घेतलेली नाही!

    Author

    • डॉ. अस्मिता हवालदार
      डॉ. अस्मिता हवालदार
    डॉ. अस्मिता हवालदार

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित

    1 Comment

    1. Neha Nadkarni on October 28, 2025 9:53 pm

      बनगरवाडी लहान असतानाच वाचले होते परत वाचायला घ्यायला हवे

      Reply
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn