Author: Team Avaantar

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते, पुन्हा एकदा आलेय तुमच्या भेटीला! वांद्रे येथे संध्याकाळी एक इव्हेंट होता. छान तयार होऊन निघाले होते. म्हटलं, चला कॅब बुक करुयात. पण बुकच होईना! त्यात ‘गुगळीण मावशी’ प्रवासाचा वेळही खूप दाखवत होती. मग उत्तम आणि जलद पर्याय निवडला. रिक्षा केली आणि कांदिवली स्टेशन गाठलं. लोकल ट्रेनमध्ये बसून वांद्र्याला गेले. ट्रेनमध्ये नेहमीचे एंटरटेन्मेन्ट… ‘अय्या तुम्ही’, ‘अमुक एका सीरियलमधलं तुमचं काम’, ‘तुमचा तो शो’, ‘तुमचं दिसणं’ आणि मग सेल्फी… यात वांद्रे कधी आलं ते कळलंच नाही. स्टेशनवरून रिक्षा केली आणि इव्हेंटचं ठिकाण गाठलं. दोन-तीन तास छान गेले. ओळखीची खूप माणसं भेटली. रीफ्रेश झाले आणि घरी यायला निघाले.…

Read More

अर्चना कुलकर्णी दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिरमध्ये मी नोकरी केली. संस्थेच्या अकरा शाळा होत्या. आमचे स्वतंत्र तांत्रिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय 1994मध्ये सुरू झाले. सुरुवातीला संस्थेतील इतर शाळांच्या वाचनालयातून विद्यार्थी तसेच शिक्षकांना पुस्तके मिळत होती. 2005मध्ये मी मुख्याध्यापिका झाले. 2006पासून आमच्या विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी वाचनालयाची सुविधा काही कारणाने बंद करावी लागली. तांत्रिक विद्यालयाचे विद्यार्थी तसेच कर्मचारी पुस्तकांपासून वंचित राहू लागले. तंत्र व उच्च शिक्षण विभागाच्या नियमांच्या चौकटीत तांत्रिक विद्यालयासाठी स्वतंत्र लायब्ररीयन पदाला मान्यता नव्हती. त्यामुळे वाचनालय आणि लायब्ररीयन हे दोन मोठे प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाले. कुठून तरी छोटीशी का होईना सुरुवात केली पाहिजे, हा विचार आमच्या विभावरी दामले आणि हर्षदा…

Read More

आराधना जोशी कपड्यांच्या एका ब्रॅण्डेड आऊटलेटमध्ये जाण्याचा नुकताच योग आला. हो हल्ली कपड्यांच्या दुकानांपेक्षा आऊटलेटमध्ये जाऊन खरेदी करण्याचं फॅड वाढलं आहे. आऊटलेटमध्ये तरुणवर्गाची गर्दी. बहुतेकजण मित्र-मैत्रिणींबरोबर खरेदीला आले होते. त्यांच्या आपापसात होणाऱ्या गप्पांमधून लक्षात आलं की, आता कॉलेजला सुट्टी असली तरी आऊटिंग करायला जाताना नवीन वॉर्डरोब असावा, यासाठी ही गर्दी होती. अनेकजणांना दर सहा महिन्यांनी आपला वॉर्डरोब बदलण्यात इंटरेस्ट असतो तर, काहींना विशिष्ट ब्रॅण्डचेच कपडे वापरायचे असतात. गंमत म्हणजे, कपडे खरेदी नेमकी कोणत्या ठिकाणाहून केली, हे जगाला दाखवण्यासाठी त्या-त्या आऊटलेटच्या कॅरी बॅगही महत्त्वाची भूमिका बजावत असतात. काही वर्षांपूर्वी एका संस्थेकडून तरुण वर्गात ब्रॅण्डची क्रेझ किती आहे, याबाबत एक सर्वेक्षण करण्यात…

Read More

मंदार अनंत पाटील लंडनला एकदा मी आणि पल्लवी घरी कामावरून परत येत असताना आमची भेट टोनी नावाच्या जर्मन स्पिट्झ जातीच्या अतिशय बोलके डोळे, ठेंगणा बांधा, भरपूर केस आणि अंबाडा बांधावा अशी शेपटी… असे रुपडे असलेल्या श्वानाशी झाली. त्याची मालकीण जेनिटा पण भारतीयच आहे आणि कोरोना काळात एक सहचारी म्हणून हे श्वान आणले गेले. अतिशय हुशार आणि मस्तीखोर हा साधारण 22 महिन्यांचा नर श्वान… काही मिनिटांतच माझी आणि त्याची दोस्ती झाली. जेनिटाची रीतसर परवानगी घेऊन वेळ मिळेल तेव्हा टोनीला फिरवायची जबाबदारी घेतली आहे. आता तो माझा सध्याचा सखा आहे. लिओला जाऊन अवघे दोन-तीन महिने झाले आणि टिंकरबेल नावाची डच ससुली आमच्या…

Read More

सुनीता मुकुंद शिवमहिम्नस्तोत्र हे गंधर्वराज पुष्पदंत याने रचले आहे. पुष्पदंत याचे दात कुंदकळी सारखे, शरीर सुंदर, गुणभक्ती ऐश्वर्य संपन्न अशी होती. त्यांची गणना परम शिवभक्त अशी होते. पुष्पदंत संवत पूर्व 1480 मध्ये होऊन गेला इतिहासकार त्याला घडवी समाजाचा मानतात. पण तसा आधार मिळत नाही. भगवान शिवशंकरांनी जेव्हा राक्षसांशी युद्ध केले तेव्हा त्यांच्या घामाचा एक थेंब पृथ्वीवर पडला. त्यातून “वास्तूपुरुष” निर्माण झाला. वास्तूपुरुषाची स्थापना घराच्या मध्यभागी कोठीघर जेथे असते तेथे करावी, असा संकेत आहे. वास्तूशास्त्र हे शिवाच्या ऐश्वर्य संपन्नतेतून निर्माण झालेले आहे. वास्तूपुरुषाच्या कोठ्यांमध्ये (कक्ष) सात देवांची स्थापना केली जाते. ते सात देव म्हणजे नंदी, सुग्रीव, पुष्पदंत, वरूण, असुर, शेष आणि…

Read More

जी. भालचंद्र जवळपास सर्वांचाच बँकांशी संबंध येतो. कितीही ऑनलाइन व्यवहार झाले तरी, कुठे ना कुठेतरी बँक कर्मचाऱ्यांशी डोकं लावावंच लागतं. बँकांमधील काही अनागोंदी कारभाराशी संबंधित ‘बँक व्यवहार आणि अधिकाऱ्यांच्या करामती’ या सदरातील माझा तिसरा अनुभव आता कथन करीत आहे. हा अनुभव अशा बँकेबद्दल आहे की, ज्या बँकेबरोबर माझा कोणत्याही प्रकारच्या बँकिंग व्यवहाराशी संबंध आलेला नाही. तरीपण बँकेच्या व्यवहारात (?) मी भरडून निघालो होतो. पंधरा वर्षांपूर्वी मी माझ्या घरी बीएसएनएलच्या टेलिफोनचं कनेक्शन घेतलं होतं. पण महिन्यातील 20 ते 22 दिवस टेलिफोन ‘आऊट ऑफ ऑर्डर’ रहात असल्यामुळे ऑगस्ट 2021मध्ये तो टेलिफोन मी बीएसएनएलला परत केला. नंतर घरात टेलिफोन कनेक्शन असावे म्हणून मी…

Read More

मंदार अनंत पाटील माझ्या आणि पल्लवीच्या मनात तसेच आयुष्यात कायमचा ठसा सोडून गेलेला आमचा लिओ. मी प्राणीप्रेमी असलो तरी मांजर पाळायचा योग कधीच आला नव्हता. पण पल्लवीच्या माहेरी मनू नावाची मांजर होती आणि तिच्या कितीतरी आठवणी पल्लवी नेहमी सांगायची. मी एकदा सहजच जेम्स बोवेन लिखित ‘A street cat named Bob’ नावाचे सुंदर पुस्तक वाचले आणि इतका भारावून गेलो की, सरळ जाऊन लिओला घेऊनच आलो. लिओला घरी आणले तो दिवस आषाढी एकादशीचा होता आणि आमचा विठोबा आमच्या घरी अवतरला. जिंजर म्हणजे तपकिरी रंगाचे अतिशय लोभसवाणे रुप लाभलेला आणि हाताच्या ओंजळीत मावेल इतका छोटा होता लिओ. घरी आल्यावर अगदी सगळं घर पालथं…

Read More

आराधना जोशी साल 2007. झी मराठीबरोबर 2003पासून ‘नमस्कार झी मराठी’ या फोन इन कार्यक्रमामुळे जुळलेले ऋणानुबंध कार्यक्रम बंद झाल्यामुळे संपुष्टात आले होते. झी 24 तास या वृत्तवाहिनीत येण्यासाठी संबंधितांनी सुचवले होते. मात्र शिफ्ट ड्यूटी आणि लहान मुलगी यामुळे नकार दिला होता. त्यामुळे फेब्रुवारीपासून नव्या नोकरीच्या शोधात होते. एके दिवशी पत्रकारितेतील माझे गुरु प्रकाश अकोलकर सरांचा फोन आला. “सध्या काय करतेयस? माझ्याकडे तुझ्यासाठी एक प्रपोजल आहे. लेखिका कविता महाजन यांना त्यांच्या प्रोजेक्टसाठी मदतनीस हवी आहे. तुझं नाव मी सुचवलं आहे. तू त्यांना जाऊन भेट. मी नंबर पाठवतो. तू त्यांच्याशी बोलून घे,” असा निरोप सरांनी दिला. लगेच कविता मॅडमचा नंबरही पाठवला. मी…

Read More

यश:श्री थोर विदुषी दुर्गा भागवत यांचे वडील, नारायण भागवत तसेच त्यांचे सहकारी कपिलराम वकील यांच्या ‘डालडा’वरील संशोधनाबद्दलची एक कथा अतिशय रोचक आहे. नारायण भागवत 1920च्या सुमारास टाटांच्या ऑइल कंपनीत मॅनेजर होते. तर, कपिलराम वकील हे डायरेक्टर होते. (कपिलराम वकिलांनी पुढे ‘ओखा सॉल्ट वर्क’ सुरू केले आणि नंतर टाटांनी ते विकत घेतले. त्याला आता मिठापूर असे नाव पडले आहे.) या ऑइल कंपनीचे मालक सर दोराबजी टाटा होते. त्यावेळेला या दोघांनी मिळून एक नवा प्रयोग चालविला होता; जगात तोपर्यंत तो सिद्ध झालेला नव्हता. तो प्रयोग म्हणजे म्हणजे ‘डालडा’ तुपाचा. नारायण भागवत आणि कपिलराम शर्मा यांच्या खालोखाल जपानला यात थोडंफार यश मिळालं होतं.…

Read More

मनोज जोशी कोंबडी आधी की अंड आधी? या प्रश्नाप्रमाणेच टीव्ही चित्रपट या माध्यमांचा जनमानसावर परिणाम होतो, की समाजात घडणा-या घटना लहान-मोठ्या पडद्यावर दाखविल्या जातात? हा देखील ठोस उत्तर नसलेला प्रश्न आहे. अलीकडे काही गुन्हे टीव्हीवरील गुन्हेगारीवर आधारित मालिका पाहून घडल्याचेही समोर आले आहे. तर दुसरीकडे, प्रेमापोटी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरवर चित्रपट तयार होत आहे. पबजी गेम खेळतान सचिन मीणाशी तिचे सूत जुळले आणि ती आपल्या चार मुलांना घेऊन ती नेपाळमार्गे भारतात आल्याचे सांगण्यात येते. काही वर्षांपूर्वी अभिनेते विजू खोटे यांच्याशी गप्पा मारताना, सहज हा विषय छेडलला होता. पण त्यांनी याबाबत चांगलं मत मांडलं आहे. ते म्हणाले, चित्रपटाचा जनमानसावर निश्चितच…

Read More