Author: Team Avaantar

डॉ. किशोर महाबळ विधि महाविद्यालयाचे नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले. काही दिवसांतच एका प्राध्यापकाच्या (Professor) लक्षात आले की, पहिल्या वर्षाचा एक नियमित असणारा विद्यार्थी कोणत्याही चर्चेत सहभागी व्हायला नाखूष असतो किंवा प्रश्नांची उत्तरे देणेही टाळतो. एके दिवशी तो खूप घाबरलेला आणि सतत कशाची तरी भीती वाटत असल्यासारखा दिसत होता. खरंतर, तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्याच ही गोष्ट लक्षात आली होती, मात्र त्यामागचं कारण कोणीही त्याला विचारलं नाही. त्या प्राध्यापकाच्याही ते लक्षात आलं आणि त्याला त्यांनी कारण विचारलं. आधी काहीच बोलायला तयार नसलेला तो विद्यार्थी खूप समजावल्यानंतर म्हणाला, “सर, मला वाटतं की, मी वार्षिक परीक्षेत नापास होणार आहे.” त्याचं हे उत्तर ऐकून…

Read More

सुहास गोखले श्रावण महिना सुरू झाला की, सणांची रांगच लागते. बाजारात विविध भाज्यांची रेलचेल असते, त्यामुळे अनेक वेगवेगळे पदार्थ केले जातात. एक चांगला, सर्व गुणसंपन्न पोलीस अधिकारी हाही एक प्रयत्नपूर्वक आणि वेळ घेऊन तयार झालेला पदार्थ आहे. त्यातही व्हेज आणि नॉन व्हेज अशा व्हरायटीज असू शकतात. श्रावण महिना सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रामाणिक, कर्तबगार (शाकाहारी) पोलीस अधिकारी बनवण्याची कृती पाहूया. साहित्य : पोलीस या शब्दाचे स्पेलिंग लक्षात ठेवले की, सगळे ingredients लक्षात राहतील. Politeness (नम्रता), Obedience (आज्ञाधारक), Loyalty (ईमानदारी), Intelligence (हुशारी) किंवा Inquisitiveness (चौकसपणा), Compassion (दयाळू) आणि Enthusiasm (उत्साह) हे या रेसिपीचे मुख्य घटक आहेत. कृती : हे सगळे पदार्थ…

Read More

प्राजक्ता अनंत काथे (ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड) मेष राशी या आठवड्यात आर्थिक स्थिती चांगली राहील. नातेवाईक किंवा मित्रांनी उधार घेतलेले पैसे परत मिळतील. या आठवड्यात मनाप्रमाणे खर्च करू शकाल, पण खर्चाचे नियोजन करा. ज्येष्ठ्यांच्या आरोग्यावर खर्च होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना नवीन आव्हानात्मक जबाबदारीची कामे मिळण्याची शक्यता आहे. अमावस्येच्या काळात कुटुंबासोबत वेळ घालवू शकाल. महिलांना भावंडसौख्य मिळेल. भाऊ, बहिणीबरोबर छान वेळ घालवू शकाल. विद्यार्थ्यांनी महत्त्वाकांक्षी रहावे, नव्या संधीचे सोने करू शकाल. वृषभ राशी या आठवड्यात कामाचे नियोजन करणे खूप आवश्यक आहे. नवीन जबाबदारी आत्मविश्वासाने पूर्ण करू शकाल, मात्र स्वतः लक्ष देण गरजेचे आहे. दुसऱ्यावर अवलंबून राहू नये. चिडचिड होऊ शकते.…

Read More

डॉ. प्रिया गुमास्ते मागील भागात आपण आयुर्वेद (Ayurveda) ऋतुचर्या म्हणजे काय, हे समजून घेतले. आता ऋतूंनुसार आपण आपल्या जीवनशैलीत कोणते बदल करायचे आणि ते का करायचे, ते पाहू. सूर्याच्या स्थितीनुसार वर्षाचे दोन भाग (काल) केले जातात. आदान काल (उत्तरायण) आणि विसर्ग काल (दक्षिणायन). आदान म्हणजे शोषणे किंवा काढून घेणे आणि विसर्ग म्हणजे देणे. आदान काळ आदान काळ म्हणजे सूर्याचा उत्तरायण काळ. सूर्य जेव्हा उत्तर दिशेकडे सरकतो. आदान काळात, शिशिर (Winter), वसंत (Spring) आणि ग्रीष्म (Summer) या तीन ऋतूंचा समावेश होतो. तत्र रविर्भाभिरादानो जगतः स्नेहं वायवस्तीवृक्षाश्चोपशोषयन्तः शिशिरवसन्तग्रीष्मेषुक्रमं रौक्ष्यमुत्पादयन्तो रुक्षां रसांस्तिकषायकटंशचाभिवर्धयन्तो नृणां दौर्बल्यमावहन्ति ||6|| अर्थ : आदानकालात सूर्य त्याच्या उष्ण किरणांसह वातावरणातील…

Read More

रविंद्र परांजपे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे की, मानवाच्या तीन मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा या आहेत. आता ‘निरामय आरोग्य’ या वाढत्या गरजेची त्यात भर पडलेली आहे. आपले आरोग्य निरामय रहायला हवे, असे प्रत्येकालाच वाटत असते. वास्तविक, निरामय आरोग्य ही आपली उपलब्धी नसून आपली मूलभूत गरज आहे. हे वास्तव लक्षात घेऊन आपण निरामय आरोग्य प्राप्तीसाठी तसेच संवर्धनासाठी सतत प्रयत्नशील रहायला हवे. आता आपण निरामय आरोग्य या संकल्पनेचा थोडक्यात अर्थ जाणून घेऊ या. शरीराची कोणतीही तक्रार नसणे किंवा आजारी नसणे म्हणजे चांगले आरोग्य असे आपण सर्वसाधारणपणे मानतो. वास्तविक, आयुर्वेदाने स्वस्थ आरोग्याची समर्पक शब्दांत व्याख्या केली आहे. या व्याख्येनुसार, स्वस्थ आरोग्याची सोप्या…

Read More

लीना जोशी परुळेकर लेखाच्या या भागात आपण कोणत्या प्रकारच्या त्वचेसाठी कोणती उत्पादने वापरावीत, हे पाहणार आहोत. त्याआधी आपण आपल्या त्वचेचा pH म्हणजे काय ते पाहू. pH ची माहिती अशासाठी गरजेची आहे की, कोणत्या प्रकारची उत्पादने कोणत्या प्रकारच्या त्वचेवर वापरल्यानंतर त्वचेच्या pH चा समतोल राखला जातो, हे कळावे म्हणून. pH Scale ही 0 ते 14 या rangeमध्ये असते. त्यात 7 ही neutral (समतोल) range असते. 7 पेक्षा कमी range असेल तर ते acid मानले जाते आणि 7 पेक्षा जास्त range असेल तर ते alkali किंवा non-acid मानले जाते. आपल्या त्वचेच्या बाबतीत बोलायचे झाले तर, ती नैसर्गिकरित्या acidic असते, तिची pH range ही 4.5…

Read More

शैलेश विजया सोमनाथ महाजन ‘भस्मासुर राक्षस’ हा काय पुराणकाळातच होता का? आजच्या अद्यावत काळात सुद्धा भस्मासुर राक्षस आहे. तो कोणता? सर्वात प्रथम, हे भस्मासुर प्रकरण म्हणजे काय? हे थोडक्यात समजणे गरजेचे आहे. मला खात्री आहे, कित्येकांना हे भस्मासुर प्रकरण माहीत नसणार. पूर्वी एक राक्षस होता. त्याने भगवान श्री शंकरांची खूप तपश्चर्या केली आणि भगवान श्री शंकरदेव त्याला प्रसन्न झाले आणि म्हणाले, “काय मागायचे ते वरदान माग?” “मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन, तो जळून भस्मसात झाला पाहिजे,” असे वरदान त्या राक्षसाने मागितले. भगवान श्री शंकर म्हणजे भोलेबाबाच ते, ‘तथास्तु’ म्हणाले. म्हणून त्याचे नाव भस्मासुर राक्षस असे झाले. हे असे वरदान मिळाल्यावर…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 17 जुलै 2025; वार : गुरुवार भारतीय सौर : 26 आषाढ शके 1947; तिथि : सप्तमी 19:09; नक्षत्र : रेवती 27:38 योग : अतिगंड 09:28; करण : विष्टी 08:07, बालव 30:07 सूर्य : मिथुन; चंद्र : मीन 27:38; सूर्योदय : 06:09; सूर्यास्त : 19:19 पक्ष : कृष्ण; ऋतू : ग्रीष्म; सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 करी दिन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यवसायाच्या दृष्टीने परिस्थिती चांगली असणार आहे. पण उत्साहाची पातळी घसरलेली असेल. अनावश्यक खर्च करण्याचे टाळा, अन्यथा आर्थिक…

Read More

अजित गोगटे `शीतावरून भाताची परीक्षा` या म्हणीनुसार काही पत्रकारांच्या अपवादात्मक वर्तनावरून सर्वच पत्रकारांच्या गैरवर्तनाचे गृहीतक काढणे योग्य आहे का? यावर ज्यामुळे मत-मतांतरे मांडली गेली त्या प्रसंगाविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे. हा प्रसंग मी दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये नोकरीला असताना 1980च्या दशकाच्या पूर्वार्धात घडला. नक्की कुठे ते आठवत नाही. पण त्यावर्षीचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राबाहेर, बहुदा मध्य प्रदेशात कुठे तरी भरणार होते. संमेलनाच्या आयोजन समितीने संमेलनाच्या कार्यक्रमपत्रिकेसोबत `लोकसत्ता`सह मुंबईतील वृत्तपत्रांना औपचारिक निमंत्रण पाठविले होते. सोबत एक पत्रही होते. त्यात संमेलनासाठी येणाऱ्या माध्यम प्रतिनिधींची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली जाईल, या नेहमीच्या मजकूराखेरीज पुढील सूचनाही ठळकपणे लिहिलेली होती : “काही पत्रकार…

Read More

आराधना जोशी यंदा 9 जुलैला ई टीव्ही मराठीचा (Etv Marathi) 25वा वर्धापन दिन साजरा झाला. या ई टीव्हीच्या पहिल्या दिवसापासूनच्या प्रवासात मी रिपोर्टर म्हणून सहप्रवासी होते. ई टीव्ही मराठीच्या त्यावेळच्या मुंबई ब्युरो चीफ जयश्री मॅडमनी विश्वास दाखवून राजकीय बीटवर काम करण्याची संधी मला दिली होती. त्यामुळे अनेक राष्ट्रीय तसेच महाराष्ट्रातील नेत्यांना भेटण्याची संधी मिळाली होती. आजची आठवण माजी उपपंतप्रधान आणि संरक्षणमंत्री लालकृष्ण आडवाणी यांच्याशी निगडीत आहे. दिवस नेमका आठवत नाही, पण साल होतं 2000. ई टीव्ही मराठी चॅनल नुकतंच सुरू झालं होतं. माझ्या दिवसभरातल्या बातम्यांचं काम आटोपून मी ऑफिसला आले आणि जयश्री मॅडमनी मला बोलावून घेतलं. एक निमंत्रणपत्रिका माझ्यासमोर ठेवली…

Read More