Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
अजित गोगटे मागील दोन लेखांमध्ये मी माझा विनातिकीट लोकलचा प्रवास आणि त्याबद्दलची माझी मते लिहिली होती. त्यानंतर माझे स्वत:चे अनुभव सांगितले. कल्याण येथे माझे वास्तव्य आणि नोकरी मुंबईत. सन 1978 ते सन 2020 अशी तब्बल 42 वर्षे मी कल्याण ते बोरिबंदर (आताचे सीएसएमटी) अशी दैनंदिन ये-जा मध्य रेल्वेच्या लोकलने केली. मध्यंतरीची सलग 12 वर्षे मी तिकीट किंवा मासिक / त्रैमासिक पास न काढता हा लोकलचा प्रवास केला. स्वत:चा महसूल बुडू नये, याची रेल्वेला आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनाच जर फिकीर नसेल तर नागरिकांकडून तरी प्रामाणिकपणाची अपेक्षा कशी आणि किती ठेवता येईल? रेल्वेला स्वत:च्या महसूलाची चिंता नाही, या माझ्या म्हणण्याच्या पुष्ठ्यर्थ मी माझे…
चंद्रशेखर माधव सुमारे 20 वर्षांपूर्वीची गोष्ट. आमचा एक मित्र शनीभक्त होता. नेहमी शनिशिंगणापूरला जायचा. त्याच्यासोबत आम्हीही बरेचदा शुक्रवारी रात्री कारने निघायचं… शनिवारी पहाटे शनिशिंगणापूरला दर्शन घ्यायचं आणि सकाळी 11 वाजेपर्यंत पुण्यात परत यायचं… अशा अनेक ट्रिप केल्या. बरेचदा, आम्ही पाच मित्र कारने जायचो. असंच एका ट्रिपच्या दरम्यान घडलेली ही घटना आहे. तेव्हा निखिलकडे मारुती एस्टीम होती. त्याच गाडीने आम्ही निघालो. साधारणपणे रात्री नऊ वाजता पुण्यातून निघालो. शिरूरच्या आसपास थांबून जेवण वगैरे केलं. त्यात सुमारे एक तास गेला असावा. साधारणपणे साडेअकराच्या सुमारास आम्ही नगरच्या घाटात पोहोचलो आणि घाट चढायला सुरुवात केली. यादरम्यान रात्री प्रवास करणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या, जळगावकडे वगैरे जाणाऱ्या, बऱ्याचशा बसेस,…
स्मिता मनोहर “भेटी लागी जीवा लागलीसे आस…” कधीपासून मनात होतं की, एकदा तरी वारीला जायचं… अर्थात, चालत पूर्ण वारी करणं मला तरी शक्य नव्हतं, पण थोडं अंतर का होईना जावं आणि तो अनुभव घ्यावा, असं सारखं मनात येत होतं. या वर्षी अचानक एका व्हॉट्सएप ग्रुपवर वारीसंबंधी मेसेज आला, आणि आम्ही तीन मैत्रिणींनी वारीला जायचे ठरवले, आम्हाला अजून तिघी येऊन मिळाल्या, त्यात माझी भावजय विद्या अर्थात रेवती महाबळ पण तयार झाली, आणि 21 तारखेला दुपारी 2 वाजता आम्ही सर्वजणी ठाण्याहून निघालो. ठाण्याहून गाडीने जाताना संपूर्ण वारीमय वातावरण झाले होते. कित्येकजणींची आमच्यासारखी पहिलीच वारी होती… त्यामुळे उत्साह, आनंद सगळ्याजणींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत…
उमा सुहास काळे हल्ली मोबाइल आल्यापासून औपचारिकता म्हणजेच आपल्या नेहमीच्या भाषेत ‘फॉर्म्यालिटीज’चे फारच पेव फुटल्याचे दिसते. सकाळी गादीतून बाहेर पडण्यापूर्वी डोळे किलकिले झाल्याबरोबर सराईतासारखा आपला हात मोबाइलला जवळ घेतो आणि डाटा आँन करतो. हे मी “मेजॉरिटी इज दी लॉ” या नियमाने सांगतेय. “मी अजिबात असं नाही करत,” असं उगाच कोणीही म्हणू नये. अगदी डाटा ऑन केल्याबरोबर लगेच “गुडमॉर्निंग”, “सुप्रभात”चे मेसेजेस फोटो रुपात, शब्द रुपात नाही तर व्हिडीओ रुपात टपटप प्राजक्ताच्या फुलांसारखे व्हॉट्सएपच्या अंगणात येऊन पडतात. आत्ता इतके सारे गुडमॉर्निंग जर लॉटमध्ये आपल्याकडे आले तर, काय बिशाद त्या मॉर्निंगची ‘गुड’ न होण्याची. तिला ‘गुडमॉर्निंग’ म्हणजेच, ‘सुप्रभात’ होणं क्रमप्राप्त आहेच. अशा तऱ्हेने…
(एक संवेदनशील समस्या… कच्चे प्रेम – भाग 2) अर्चना कुलकर्णी डिसेंबर हा साधारणपणे शाळा, कॉलेजमधील विविध कार्यक्रमांचा महिना. आमच्या कनिष्ठ महाविद्यालयात दुपारी बारा वाजता नृत्य स्पर्धा पार पडली. त्यानंतर मी कार्यालयीन कामात मग्न असताना दुपारी चारच्या सुमारास एक वयस्कर गृहस्थ तावातावाने थेट माझ्या केबिनमध्ये आले. ते जवळच्याच सर्वोदय हाऊसिंग सोसायटीचे सेक्रेटरी नाडकर होते. ‘तुमच्या ज्युनियर कॉलेजची मुलं-मुली आमच्या सोसायटीच्या बागेत दुपारी आले होते. चक्क जोडी-जोडीने झाडाखालच्या बाकावर बसून प्रेमाचे चाळे करत होते,’ अशी त्यांची तक्रार होती. जाता जाता चार आयकार्ड नाडकरांनी माझ्या टेबलावर भिरकावली. दुसऱ्या दिवशी सकाळी शिस्तपालन समिती प्रमुखांकडे नाडकरांनी दिलेली चार ओळखपत्रे दिली. शिक्षकांनी त्यावरून त्यांना आणि त्यांच्या…
आराधना जोशी आयुष्याचा सूर महत्त्वाचा… म्हणूनच 21 जून रोजी जागतिक संगीत दिन साजरा केला जातो. तसं पाहिलं तर, शास्त्रीय संगीतापासून फिल्मी संगीतापर्यंत… भारतीयांचे जीवन त्यानेच व्यापलेले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये ज्या 64 कला मानल्या गेल्या आहेत, त्यात संगीत ही एक महत्त्वाची कला आहे. भारतीय संगीताने जागतिक पातळीवर स्वतःची ओळख तयार केली आहे. आज अनेक परदेशी तरुण, तरुणी भारतीय संगीत शिक्षणासाठी भारतात दाखल होत आहेत. तथापि, असा दिवस साजरा करण्याची प्रथा फ्रान्समध्ये आणि नंतर ती जगातील इतर देशांमध्ये सुरू झाली. खरंतर, संगीताचा हा कान आपल्याला जन्मजात मिळालेला असतो. आईच्या पोटात असताना तिच्या हृदयाचे ठोके हे बाळाचं पहिलं संगीत असतं. आज गर्भसंस्कारांना असणारं…
आराधना जोशी शनिवारी जागतिक योग दिन साजरा केला जातोय. गेल्या काही वर्षांपासून आरोग्याबाबत बऱ्यापैकी जागृती झाली आहे. याबाबत तरुणाई देखील गंभीर असल्याचे दिसत आहे. विशेषत:, मुलांना सिक्स पॅक्स, बलदंड बायसेप्स यांचं आकर्षण तर मुलींना झीरो फिगरचं. वातानुकूलित जिममध्ये मशीनच्या सहाय्याने, सप्लिमेंटसच्या मदतीने शरीर संपदा कमावली तरी, मानसिक शांतता मात्र हरवलेलीच आहे. आयुष्यातील ताणतणावांना सामोरं जाताना लहान वयातच होणारा उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाचा त्रास, हृदयविकाराच्या झटक्याचा धोका यामुळे अस्थिरता आणि अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्याचा नातेसंबंधांवरही परिणाम होऊ लागला आहे. या सगळ्याचा आपल्या जीवनशैलीशी खूप जवळचा संबंध आहे, हे लक्षात आल्यावर तरुणवर्ग योगाभ्यासाकडे वळू लागला आहे. दरवर्षी 21 जून रोजी जागतिक…
यश:श्री खूप दिवसांनी लिहायला बसले आहे. जर लिहायचेच झाले, तर काय लिहायचे? अवतीभोवती तसेच विषय भरपूर असतात, पण प्रत्येक विषय हा लिहिण्यासाठी ‘चार्ज’ करणारा नसतो. काही वेळेस एखादी अशी लहानशी घटना असते, पण ती दिवसभर नव्हे तर, काही दिवस तरी डोक्यात पिंगा घालत राहते. त्याच्या अनुषंगाने येणारे विचार लेखाच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न मी करते. जसे सुचत जाते, तसे लिहिते. ते अभ्यासपूर्ण किती होते, वैचारिक किती होते, गंभीर विषयांना हात घालणारे किती होते, हे माहीत नाही. एखाद्या गोष्टीचे किंवा घटनेचे विश्लेषण करणारी किंवा त्यावर आपले ‘वैचारिक’ मत मांडणारी मी कुणी फार मोठी लेखिका नाही. सर्वसामान्यांप्रमाणे मनात येणाऱे विचार मांडण्याचा हा प्रामाणिक…
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते. आणखी एक आठवण सांगायला तुमच्या भेटीला. साधारणपणे 1984पासून मी नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. अर्थात, सुरुवात बालनाट्यापासून झाली. पण आतापर्यंतच्या प्रवासात प्रत्येक नाटकाची वेगळी आठवण आहे… मी एका विनोदी नाटकात काम केलंय, ‘बिघडले स्वर्गाचे दार’ हे नाटक! त्यात लक्ष्मीकांत बेर्डे, राजा गावडे आणि खूप सारे दिग्गज होते अन् मी एकटीच मुलगी. (तेव्हा 16-17 वर्षांची मुलगीच होते.) विनोदी नाटक आणि सोबत हे रथीमहारथी म्हणून मला धडकीच भरली होती. त्यात विनोदी नाटक करणं खूप कठीण असतं. कारण, त्यात टायमिंग खूप महत्त्वाचं असतं. बरं, मी तशी नवखीच आणि समोर लक्ष्यादादा आणि राजाभाऊ… केव्हा काय addition घेतील आणि त्या…
अजित गोगटे गेल्या आठवड्यात मी माझा विनातिकीट लोकलचा प्रवास आणि त्याबद्दलची माझी मते लिहिली होती. काहीजण या संदर्भात आणखी एक मुद्दा मांडतात. ते म्हणतात की, रेल्वे सरकारची म्हणजे लोकांचीच आहे. लोकांनीच महसूल बुडविला तर, सरकारचा गाडा कसा चालणार? त्यामुळे सरकारला प्रामाणिकपणे महसूल देणे, हे नागरिक म्हणून लोकांचे कर्तव्य आहे. पण प्रश्न असा आहे की, स्वत:चा महसूल बुडू नये, याची रेल्वेला आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनाच जर फिकीर नसेल तर नागरिकांकडून तरी प्रामाणिकपणाची अपेक्षा कशी आणि किती ठेवता येईल? रेल्वेला स्वत:च्या महसूलाची चिंता नाही, या माझ्या म्हणण्याच्या पुष्ठ्यर्थ मी खाली काही अनुभव देत आहे. यातील काही अनुभव प्रत्यक्ष माझ्याबाबतीत घडलेल्या घटना आहेत. बच्चों…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- Blog 1
- अध्यात्म 240
- अवांतर 171
- आरोग्य 88
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 181
- मैत्रीण 16
- ललित 499
- वास्तू आणि वेध 353
- शैक्षणिक 72
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
