Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
प्राजक्ता अनंत काथे (ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड) मेष राशी या आठवड्यात आर्थिक स्थिती चांगली राहील. नातेवाईक किंवा मित्रांनी उधार घेतलेले पैसे परत मिळतील. या आठवड्यात मनाप्रमाणे खर्च करू शकाल, पण खर्चाचे नियोजन करा. ज्येष्ठ्यांच्या आरोग्यावर खर्च होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना नवीन आव्हानात्मक जबाबदारीची कामे मिळण्याची शक्यता आहे. अमावस्येच्या काळात कुटुंबासोबत वेळ घालवू शकाल. महिलांना भावंडसौख्य मिळेल. भाऊ, बहिणीबरोबर छान वेळ घालवू शकाल. विद्यार्थ्यांनी महत्त्वाकांक्षी रहावे, नव्या संधीचे सोने करू शकाल. वृषभ राशी या आठवड्यात कामाचे नियोजन करणे खूप आवश्यक आहे. नवीन जबाबदारी आत्मविश्वासाने पूर्ण करू शकाल, मात्र स्वतः लक्ष देण गरजेचे आहे. दुसऱ्यावर अवलंबून राहू नये. चिडचिड होऊ शकते.…
डॉ. प्रिया गुमास्ते मागील भागात आपण आयुर्वेद (Ayurveda) ऋतुचर्या म्हणजे काय, हे समजून घेतले. आता ऋतूंनुसार आपण आपल्या जीवनशैलीत कोणते बदल करायचे आणि ते का करायचे, ते पाहू. सूर्याच्या स्थितीनुसार वर्षाचे दोन भाग (काल) केले जातात. आदान काल (उत्तरायण) आणि विसर्ग काल (दक्षिणायन). आदान म्हणजे शोषणे किंवा काढून घेणे आणि विसर्ग म्हणजे देणे. आदान काळ आदान काळ म्हणजे सूर्याचा उत्तरायण काळ. सूर्य जेव्हा उत्तर दिशेकडे सरकतो. आदान काळात, शिशिर (Winter), वसंत (Spring) आणि ग्रीष्म (Summer) या तीन ऋतूंचा समावेश होतो. तत्र रविर्भाभिरादानो जगतः स्नेहं वायवस्तीवृक्षाश्चोपशोषयन्तः शिशिरवसन्तग्रीष्मेषुक्रमं रौक्ष्यमुत्पादयन्तो रुक्षां रसांस्तिकषायकटंशचाभिवर्धयन्तो नृणां दौर्बल्यमावहन्ति ||6|| अर्थ : आदानकालात सूर्य त्याच्या उष्ण किरणांसह वातावरणातील…
रविंद्र परांजपे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे की, मानवाच्या तीन मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा या आहेत. आता ‘निरामय आरोग्य’ या वाढत्या गरजेची त्यात भर पडलेली आहे. आपले आरोग्य निरामय रहायला हवे, असे प्रत्येकालाच वाटत असते. वास्तविक, निरामय आरोग्य ही आपली उपलब्धी नसून आपली मूलभूत गरज आहे. हे वास्तव लक्षात घेऊन आपण निरामय आरोग्य प्राप्तीसाठी तसेच संवर्धनासाठी सतत प्रयत्नशील रहायला हवे. आता आपण निरामय आरोग्य या संकल्पनेचा थोडक्यात अर्थ जाणून घेऊ या. शरीराची कोणतीही तक्रार नसणे किंवा आजारी नसणे म्हणजे चांगले आरोग्य असे आपण सर्वसाधारणपणे मानतो. वास्तविक, आयुर्वेदाने स्वस्थ आरोग्याची समर्पक शब्दांत व्याख्या केली आहे. या व्याख्येनुसार, स्वस्थ आरोग्याची सोप्या…
लीना जोशी परुळेकर लेखाच्या या भागात आपण कोणत्या प्रकारच्या त्वचेसाठी कोणती उत्पादने वापरावीत, हे पाहणार आहोत. त्याआधी आपण आपल्या त्वचेचा pH म्हणजे काय ते पाहू. pH ची माहिती अशासाठी गरजेची आहे की, कोणत्या प्रकारची उत्पादने कोणत्या प्रकारच्या त्वचेवर वापरल्यानंतर त्वचेच्या pH चा समतोल राखला जातो, हे कळावे म्हणून. pH Scale ही 0 ते 14 या rangeमध्ये असते. त्यात 7 ही neutral (समतोल) range असते. 7 पेक्षा कमी range असेल तर ते acid मानले जाते आणि 7 पेक्षा जास्त range असेल तर ते alkali किंवा non-acid मानले जाते. आपल्या त्वचेच्या बाबतीत बोलायचे झाले तर, ती नैसर्गिकरित्या acidic असते, तिची pH range ही 4.5…
अजित गोगटे `शीतावरून भाताची परीक्षा` या म्हणीनुसार काही पत्रकारांच्या अपवादात्मक वर्तनावरून सर्वच पत्रकारांच्या गैरवर्तनाचे गृहीतक काढणे योग्य आहे का? यावर ज्यामुळे मत-मतांतरे मांडली गेली त्या प्रसंगाविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे. हा प्रसंग मी दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये नोकरीला असताना 1980च्या दशकाच्या पूर्वार्धात घडला. नक्की कुठे ते आठवत नाही. पण त्यावर्षीचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राबाहेर, बहुदा मध्य प्रदेशात कुठे तरी भरणार होते. संमेलनाच्या आयोजन समितीने संमेलनाच्या कार्यक्रमपत्रिकेसोबत `लोकसत्ता`सह मुंबईतील वृत्तपत्रांना औपचारिक निमंत्रण पाठविले होते. सोबत एक पत्रही होते. त्यात संमेलनासाठी येणाऱ्या माध्यम प्रतिनिधींची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली जाईल, या नेहमीच्या मजकूराखेरीज पुढील सूचनाही ठळकपणे लिहिलेली होती : “काही पत्रकार…
आराधना जोशी यंदा 9 जुलैला ई टीव्ही मराठीचा (Etv Marathi) 25वा वर्धापन दिन साजरा झाला. या ई टीव्हीच्या पहिल्या दिवसापासूनच्या प्रवासात मी रिपोर्टर म्हणून सहप्रवासी होते. ई टीव्ही मराठीच्या त्यावेळच्या मुंबई ब्युरो चीफ जयश्री मॅडमनी विश्वास दाखवून राजकीय बीटवर काम करण्याची संधी मला दिली होती. त्यामुळे अनेक राष्ट्रीय तसेच महाराष्ट्रातील नेत्यांना भेटण्याची संधी मिळाली होती. आजची आठवण माजी उपपंतप्रधान आणि संरक्षणमंत्री लालकृष्ण आडवाणी यांच्याशी निगडीत आहे. दिवस नेमका आठवत नाही, पण साल होतं 2000. ई टीव्ही मराठी चॅनल नुकतंच सुरू झालं होतं. माझ्या दिवसभरातल्या बातम्यांचं काम आटोपून मी ऑफिसला आले आणि जयश्री मॅडमनी मला बोलावून घेतलं. एक निमंत्रणपत्रिका माझ्यासमोर ठेवली…
चंद्रशेखर माधव एकदा रात्री साधारण साडेआठच्या सुमारास अचानक अरुणचा फोन आला. अरुण म्हणजे माझ्या ऑफिसमधला माझा सहकारी. मला म्हणाला “तुमच्या घराजवळ माझी गाडी बंद पडली आहे. जरा येता का?” मी त्याला लगेचच “आलोच,” असं म्हणून फोन ठेवला… मी घरीच होतो, त्यामुळे लगेचच तिथे पोहोचलो. बघितलं तर गाडीमध्ये अरुण, त्याचे दोन मोठे बंधू आणि आई पण होती. मी पोहोचताच अरुण खाली उतरला. गाडी दुरुस्त करण्यासंबंधी आम्हाला फार काही कळत होतं, असं नाही; पण तरीसुद्धा आम्ही दोघांनी मिळून थोडीशी खटपट केली. कुठे एखादी वायर वगैरे निघालेली दिसतेय का किंवा सैल झाली असेल का? असले प्रयत्न करून पाहिले. पण काही केल्या गाडी सुरू…
सुरेश महाबळ योगायोग हा प्रकार अनेकांच्या जीवनामध्ये येत असतो. असाच एक प्रकार माझ्यासोबत झाला आहे, तो पण देवस्थानाच्या ठिकाणी. यामुळे माझा तो सुखद धक्का होता. मोठी मुलगी हर्षा B.Tech. झाल्यानंतर लगेचच एका MNC कंपनी मधे रुजू झाली आणि अद्याप कार्यरत आहे. ते वर्ष होते 2009. या कंपनीचे महाराष्ट्र आणि इतर प्रांतांमध्ये स्वमालकीचे रिसॉर्ट आहेत. 2011 साली हर्षाला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी 2012मध्ये तिने महाबळेश्वर-पाचगणी रिसॉर्टसाठी अर्ज केला आणि ऑफ सीझन असल्यामुळे तिला बुकिंगसुद्धा मिळाले. त्याप्रमाणे मला, पत्नी संगीता आणि दुसरी कन्या मानसी असे आम्हाला ठाण्यात दुसऱ्या भावाकडे जळगावहून यावयास सांगितले. हर्षाने टॅक्सी बुकिंग अधीच करून ठेवले होते. दुसऱ्या दिवशी…
डॉ. किशोर महाबळ “सर, तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला काही गोष्टी सुचवू का?” एका विद्यार्थ्याने त्याच्या वर्गशिक्षक असलेल्या तरुण प्राध्यापकांना विचारले. प्राध्यापकांनी अर्थातच होकारात्मक प्रतिसाद दिल्यावर तो विद्यार्थी पुढे म्हणाला, “सर, तुम्ही आजकालच्या आधुनिक कल्पना स्वीकारल्या आहेत, पण आधुनिक जीवनशैली स्वीकारलेली नाही. मला वाटते की, साध्याशा दिसणाऱ्या शर्ट, पँटऐवजी तुम्ही रोज अतिशय आकर्षक फॅशनेबल, ब्रॅण्डेड कपडे वापरायला सुरूवात करायला हवी. टू व्हीलर वापरण्याऐवजी तुम्ही लवकरच एखादी चांगली कारही खरेदी केली पाहिजे. शक्य असल्यास कार चालवण्यासाठी एखादा चालकही ठेवा.” या सगळ्या सूचना ऐकून प्राध्यापकांना मजा वाटली; पण त्यामागची कारणं मात्र त्यांच्या लक्षात आली नाहीत. म्हणून काहीशा उत्सुकतेनं त्यांनी विचारलं, “तुझ्या…
शैलेश विजया सोमनाथ महाजन प्रत्येकाच्या मनात अनेकदा द्वंद्व सुरू असते. प्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअर यांच्या ‘हॅम्लेट’ नाटकातील ’ “To be, or not to be, that is the question…’ असाच काहीसा प्रकार सुरू असतो. पण हेही लक्षात घेतलं पाहिजे, सामाजिक स्तरावरही असेच द्वंद्व सुरू असते. राष्ट्र उभारणीसाठी विरोध कोणाचा? तर आपलाच! आपल्याच देशातल्या नागरिकांचा, का? अज्ञानापोटी की अतिज्ञानामुळे? अहंकारापोटी? स्वार्थापोटी? की प्रवृत्तीच वाईट आहे, म्हणून! काम करायला नको, सर्व गोष्टी फुकट पाहिजेत अशा कामचोर लोकांचा? माझी, आमची सत्ता जाईल म्हणून? सर्व कारभार बिनबोभाट व्हावा म्हणून? सहज दुसऱ्यांना फसवून आपला स्वार्थ साधता येतो, की येत नाही म्हणून? की दुसऱ्यांशी लागेबांधे आहेत, म्हणून?…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- Blog 1
- अध्यात्म 240
- अवांतर 171
- आरोग्य 88
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 181
- मैत्रीण 16
- ललित 499
- वास्तू आणि वेध 353
- शैक्षणिक 72
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
