Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते… पुन्हा तुमच्या भेटीला आलेय. गोष्ट आहे, सदाफुली झाडाची! बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा… बालपणीचा काळ सुखाचा… हे सगळं ऐकायला किती छान वाटतं… पण मोठेपणीच! लहान असताना नाही. लहान मुलांना नाही म्हटलं तरी, सतत काही ना काही प्रश्न पडत असतात. मलाही पडायचे. पण त्याची उत्तरे काही मिळायची नाहीत. ‘गप्प बस, काय सारखं डोकं खाते…,’ असेच म्हणायचे सगळे मला. पण तेच सर्व, माझी मुले मोठी होत असताना मला मात्र, सांगायचे की, ‘मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देत जा, टाळू नको!!’ हल्लीच्या मुलांना प्रश्न पडला तर, त्यांना उत्तर द्यायलाय गूगल बाबा किंवा गूगळीण मावशी आहेच! गिरगावातलं आमचं घर तसं…
आराधना जोशी पुल स्पर्श होताच दुःखे पळाली, नवा सूर, आनंदयात्रा मिळाली, निराशेतून माणसे मुक्त झाली, जगू लागली, हास्यगंगेत न्हाली असं वर्णन कवी मंगेश पाडगावकर यांनी ज्यांच्याबद्दल केलं आहे, त्या पु. लं.ना जाऊन आज 25 वर्षे झाली. 8 नोव्हेंबर 1919 साली जन्मलेल्या पु. लं.मध्ये थक्क करणारं गुणांचं वैविध्य तर होतंच, पण त्या प्रत्येक गुणात गाठलेला अभिनंदनीय दर्जा, विस्मित करणारी लोकप्रियता आणि या सर्वांपलिकडे जाऊन झगमगणारं नैतिक तेज तसेच माणुसकी कायमच दिसून आली. अशा या पुलंना दोन मिनिटांसाठी प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला होता तो रत्नागिरीच्या समुद्रकिनारी. कोळंब्याहून रत्नागिरीला होडीने प्रवास करून आम्ही किनाऱ्याला लागत होतो आणि समोर साक्षात सुनीताबाई आणि पुलं. त्यांनीही…
अजित गोगटे कल्याण येथे माझे वास्तव्य आणि नोकरी मुंबईत. सन 1978 ते सन 2020 अशी तब्बल 42 वर्षे मी कल्याण ते बोरिबंदर (आताचे सीएसएमटी) अशी दैनंदिन ये-जा मध्य रेल्वेच्या लोकलने केली. कल्याण ते बोरिबंदर हे रेल्वेचे अंतर 56 किमी आहे. मी सरासरी महिन्याला 25 दिवस कामावर गेलो, असे गृहित धरले तरी, या काळात मी लोकलने केलेल्या एकूण प्रवासाचे अंतर 14 लाख 11 हजार 200 किमी एवढे होते. परंतु मध्यंतरीची सलग 12 वर्षे मी तिकीट किंवा मासिक / त्रैमासिक पास न काढता हा लोकलचा प्रवास केला. म्हणजे, माझा विनातिकिट केलेला प्रवास सुमारे चार लाख तीन हजार 200 किमी एवढा होता. मी…
यश:श्री मे महिना अर्धा सरल्यावर सर्वांनाच पावसाचे वेध लागतात अन् हवामान खात्याने सांगितलेल्या अंदाजाप्रमाणे मान्सूनची वाटचाल सुरू असल्याचे समजल्यावर पावसाचे तुषार अंगावर उडाल्यासारखे वाटते. यावर्षी पावसाचं आगमन लवकरच झालंय. उन्हाचा चटका वाढलेला असतानाच बरसणाऱ्या थेंबानं एक आल्हाददायक अनुभव सर्वांना दिला. तसं पाहिलं तर पावसात भिजायला कोणाला आवडत नाही? आकाशात काळे ढग जमले आणि गार वारे वाहू लागले की, सर्व ताणतणाव क्षणात निघून जातात. आता जलधारा कोसळणार आणि मन मोहून टाकणारा मातीचा सुगंध सर्वत्र दरवळणार… अशा वेळी आठवते कविवर्य बा. भ. बोरकर यांची कविता – टप टप टप पडती थेंब, मनी वनीचे विझती डोंब वत्सल ये वास, भूमी आशीर्वच बोले गडद…
आराधना जोशी “हल्लीच्या पिढीवर काहीही संस्कार झालेले नसतात,” हे वाक्य आजकाल सर्रास ऐकायला मिळतं. पण ते कितपत योग्य आहे, याचा विचार आपण करतो का? तसं बघायला गेलं तर, माणसाच्या अनेक पिढ्या हेच वाक्य ऐकत मोठ्या झाल्या आहेत. तरीही, संस्कार म्हणजे नेमकं काय? याची व्याख्या अजूनही आपल्याला करता आलेली नाही, हेच खरं. पूर्वी ‘सातच्या आत घरात’ येणं बंधनकारक होतं. नव्हे, तो संस्कारांचा भाग होता. हा संस्कार जो मुलगा किंवा मुलगी काही कारणांमुळे पाळत नव्हते ते संस्कार विसरले, असाच शिक्का त्यांच्यावर मारला जायचा. हल्ली महानगरांमधून ऑफिसेस सुटल्यावर किंवा अन्य कारणांमुळे घरी पोहोचायला साडेआठ-नऊ तरी वाजतात. त्यामुळे तिन्ही सांजेला देवासमोर दिवा लावून ‘शुभं करोती’ म्हणणं आता अनेकदा नसतं. थोरामोठ्यांना खाली…
चंद्रशेखर माधव माझा जन्म पुण्यातच 1975 साली झाला. ही साधारण 1985 ते 1987च्या दरम्यानची गोष्ट आहे. पहिल्यापासूनच शालेय शिक्षण नूतन मराठी विद्यालयात झाले. राहायला पर्वती परिसरात असल्यामुळे इयत्ता 4थीपर्यंत आई शाळेत घ्यायला यायची. ये-जा करायचे साधन म्हणजे बस. रिक्षा नव्हत्या असं नाही, पण रोज रोज रिक्षाप्रवास परवडणारा नव्हता. इयत्ता पाचवीनंतर मात्र आम्ही आपले-आपले स्वतंत्ररीत्या शाळेत ये-जा करू लागलो. आमच्यासोबत आमच्यापेक्षा तीन-चार वर्षांनी मोठे असे आमच्याच कॉलनीत राहणारे चार-पाच जण असायचे त्यामुळे तशी काळजी नव्हती. माझ्याच शाळेत शिकणारा, पण माझ्यापेक्षा एक वर्षांनी लहान असणारा माझा मित्र विशाल आणि मी, असे आम्ही दोघे रोज मिळून बसने ये-जा करायचो. आम्ही साधारण एकाच वयाचे…
दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 12 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 02 जून 2025 वार : सोमवार तिथि : सप्तमी 20:34 नक्षत्र : मघा 22:54 योग : व्याघात 08:19 करण : गरज 8:10 सूर्य : वृषभ चंद्र : सिंह सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:12 पक्ष : शुक्ल मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष नाटककार, पटकथाकार विष्णू विनायक बोकील प्रसिद्ध नाटककार, कादंबरीकार, पटकथाकार विष्णू विनायक बोकील यांचा जन्म 2 जून 1907 रोजी पुणे येथे झाला.…
आराधना जोशी आम्ही मूळचे जळगावचे. पण बाबांच्या नोकरीमुळे मुंबईत लहानाचे मोठे झालो. रेल्वेच्या नोकरीमुळे मुंबईतल्या मुंबईतही घरं बदलावी लागली. मात्र ही सगळी घरं, मुंबईत जास्त पाऊस पडल्यावर ज्या ज्या सखल भागात पाणी साठतं, तिथल्या परिसरात होती. उदाहरणार्थ, ग्रान्ट रोड, माटुंगा रोड… त्यामुळे आईची पावसाळ्यासाठीची तयारी कायम लक्षात राहिली. आज माझ्या संसारात ती कायम मदतीला येते. पावसाळ्याच्या किमान चार महिने दुधाची पावडर घरी असायलाच पाहिजे. त्यामुळे दुधाचा प्रश्न निर्माण झाला तरी घरी एक पर्याय तयार असेल. मी पण आता पावडर आणून ठेवते. पण त्याच्या बरोबरीने रेडिमेड चहाची पाकिटंही भरून ठेवते. (नवऱ्याचा आग्रह) अमावस्या, पौर्णिमा असतील तर पावसाचा जोर वाढतो. त्यामुळे घरात…
धनंजय जोशी (‘ज्योतिष आणि वास्तू’विषयक सल्लागार) संपर्क – 8850453833 मेष मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ संकेत घेऊन येणारा आहे. घर, घरातील माणसं, आई अथवा परिवार अशा सर्वांबरोबर उत्तम वेळ घालवायची संधी या आठवड्यात मिळेल. काही भावनिक क्षण देखील अनुभवायला मिळतील. स्त्रियांनी या आठवड्यात आपण भावनाविवश होत नाही ना, या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावे. आठवड्याच्या उत्तरार्धात घरातील मुलांच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ आपल्यावर येईल. त्यात भावनेबरोबर तर्काला देखील समान महत्त्व द्यावे. वृषभ आपल्या भावंडांशी अथवा निकटच्या मित्र-मैत्रिणींशी या आठवड्यात काही वादविवाद होण्याची शक्यता आहे. तरी, आपल्या बोलण्यातून कोणाला दुखवत नाही ना, याची काळजी घ्यावी. वाहनातून छोट्या प्रवासांचे योग…
दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 11 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 01 जून 2025 वार : रविवार तिथि : षष्ठी 19:59 नक्षत्र : आश्लेषा 21:35 योग : ध्रुव 09:10 करण : कौलव 8:00 सूर्य : वृषभ चंद्र : कर्क 21:35 सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:12 पक्ष : शुक्ल मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 अरण्य षष्ठी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष ‘रावबहादूर’ धुरंधर ‘रावबहादूर’ महादेव विश्वनाथ धुरंधर यांचा जन्म दि. 18 मार्च 1867 रोजी झाला. कोल्हापूरचे कलासंस्कार लाभलेल्या या…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- Blog 1
- अध्यात्म 240
- अवांतर 171
- आरोग्य 88
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 181
- मैत्रीण 16
- ललित 499
- वास्तू आणि वेध 353
- शैक्षणिक 72
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
