Author: Team Avaantar

लीना जोशी परुळेकर मागच्या लेखात आपण पारंपरिक घरगुती उपाय पाहिले. आता या लेखात आपण काही trending ingredients आणि trends बद्दल माहिती घेऊ. सध्याच्या उत्पादनांमध्ये एक ingredient जे खूप trending आहे,- ते म्हणजे ‘Hyaluronic Acid’ (हायल्यूरॉनिक ॲसिड) मुळात हे Acid आपल्या शरीरात तयार होते. हे डोळे, joints आणि त्वचेत आढळते. हे Acid शरीरात इतर उपयोगांच्या जोडीला त्वचेला – hydration देण्याचे काम सुद्धा करते. या acid मुळे त्वचेची flexibility आणि elasticity वाढायला मदत होते, ज्यामुळे त्वचा मऊ मुलायम राहून त्यावरील fine lines आणि सुरकुत्या कमी व्हायला मदत मिळते. हे acid artificially बनवून त्याचा विविध उत्पादनांमध्ये उपयोग केला जातो. Hyaluronic Acid चे वैशिष्ट्य…

Read More

हर्षा गुप्ते शेंगा डाळ साहित्य भिजवलेली तूरडाळ – अर्धी वाटी शेंगदाणे – 3 टी-स्पून जीरं – अर्धा चमचा लसूण – 7-8 पाकळ्या कोथिंबिर – पाव वाटी मीठ, लाल तिखट, लिंबू, साजूक तूप – चवीनुसार फोडणीसाठी तेल, हिंग, मोहरी, कढिपत्ता पुरवठा संख्या – दोघांसाठी कालावधी : साधारणपणे अर्धा तास (डाळ भिजायला वेळ लागतो.) कृती तूरडाळ उकडून नीट घोटून घ्यावी. शेंगदाणे, लसूण, जिरं खमंग भाजून घ्यावेत. थोड्यावेळाने वरून कोथिंबिर घालून पुन्हा परतून घ्यावे. शेवटी लाल तिखट घालून गॅस बंद करा आणि ते मिश्रण परतवा. कढई गरम असतेच आणि लाल तिखट जळत नाही. शेंगदाण्याचे मिश्रण पाणी न घालता मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. आता कढईमध्ये…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली अध्याय दुसरा ऐसें अर्जुन तेथ बोलिला । जंव क्षण एक भ्रांति सांडिला । मग पुनरपि व्यापिला । उर्मीं तेणें ॥69॥ कीं मज पाहता उर्मी नोहे । हें अनारिसें गमत आहे । तो ग्रासिला महामोहें । काळसर्पें ॥70॥ सवर्म हृदयकल्हारीं । तेथ कारुण्यवेळेचां भरीं । लागला म्हणोनि लहरी । भांजेचि ना ॥71॥ हें जाणोनि ऐसी प्रौढी । जो दृष्टीसवें विष फेडी । तो धावया श्रीहरी गारुडी । पातला कीं ॥72॥ तैसिया पंडुकुमरा व्याकुळा ।…

Read More

वेद बर्वे अलीकडेच प्रदर्शित झालेला, ‘महावतार नरसिंह’ (Mahavatar Narsimha) हा चित्रपट, सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करतो आहे. भक्त प्रल्हाद आणि नरसिंह अवताराची गोष्ट तर आपल्याला ज्ञात आहेच, मात्र बहुतांश जणांना या गोष्टीशी जोडलेल्या ‘शरभ’ अवताराविषयी फारशी कल्पना नसावी. हिरण्यकश्यपूचा संहार करण्यासाठी भगवान श्रीविष्णूंनी नरसिंह अवतार घेतला आणि भक्त प्रल्हादाची सहाय्यता घेतली, पण मग यामध्ये ‘शरभ’ अवताराची नेमकी काय भूमिका होती… नक्की कुणी आणि का हा अवतार घेतला, जाणून घेऊया या लेखातून. नरसिंह अवतार म्हणजे भगवान विष्णूंच्या दशावतारांपैकी चौथा अवतार, जो त्यांनी भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी घेतला होता. भगवान विष्णूंनी नरसिंह म्हणजे अर्धा मानव आणि अर्धा सिंह असे  रूप धारण…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली अध्याय दुसरा येर्‍हवीं माझां चित्तीं जें होतें । तें मी विचारूनि बोलिलों एथें । परि निकें काय यापरौते । तें तुम्ही जाणा ॥52॥ पैं विरु जयांसी ऐकिजे । आणि या बोर्लाचि प्राणु सांडिजे । ते एथ संग्रामव्याजें । उभे आहाती ॥53॥ आतां ऐसेयांतें वधावें । कीं अव्हेरुनिया निघावें । या दोहोंमाजी काइ करावे । तें नेणों आम्ही ॥54॥ कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः । यत् श्रेयः स्यान्-निश्चितं ब्रूहि तन् मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्…

Read More

अनिता बाळकृष्ण वैरागडे आधीच्या लेखामध्ये काही आसने आणि त्यांचे फायदे बघितले होते. आता या लेखात उभे राहून करावयाची काही आसने आणि त्यांचे फायदे बघूया. ताडासन ताडाचे झाड त्याच्या उंचीकरीता प्रसिद्ध आहे. या आसनात शरीराची अंतिम स्थिती ही ताडाच्या झाडाप्रमाणे उंच भासते, म्हणूनच या आसनाला ‘ताडासन’ असे नाव आहे. दोन्ही पाय एका रेषेमध्ये जवळ घ्या. म्हणजे, दोन्ही पायांचे अंगठे, टाचा, गुडघे एकमेकांजवळ करून सरळ उभे रहावे. दोन्ही हात शरीराजवळ सरळ ठेवावेत. आपली नजर डोळ्यासमोरील कुठल्याही काल्पनिक स्थिर बिंदूवर केंद्रित करावी. श्वास घेत हळूहळू दोन्ही हात शरीरासमोरून सरळ रेषेत डोक्याच्या वर न्यायचे. पायाच्या टाचाही त्याच लयीत जमिनीपासून वर उचलाव्यात, पायाच्या चवड्यावर उभे राहायचे. शरीर…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली अध्याय दुसरा देवा समुद्र गंभीर आइकिजे । वर तोहि आहाच देखिजे । परी क्षोभु मनीं नेणिजे । द्रोणाचिये ॥39॥ हें अपार जें गगन । वर तयाही होईल मान । परि अगाध भलें गहन । हृदय यांचे ॥40॥ वरी अमृतही विटे । कीं काळवशें वज्र फुटे । परि मनोधर्मु न लोटे । विकरविला हा ॥41॥ स्नेहालागीं माये । म्हणिपे तें कीरु होये । परि कृपा ते मूर्त आहे । द्रोणीं इये ॥42॥ हा कारुण्याची…

Read More

आराधना जोशी साहित्य पिवळी मूगडाळ – 1 वाटी उडदाची डाळ – 2 टेबलस्पून मीठ – चवीनुसार हिंग पावडर – पाव छोटा चमचा बारीक चिरलेला कांदा – अर्धी वाटी हिरवी मिरची – 2 नग उकडून घेतलेले स्वीट कॉर्न – अर्धी वाटी बारीक चिरलेली हिरवी सिमला मिरची – अर्धी वाटी किसलेले गाजर – अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो – पाऊण वाटी जिरं – 1 लहान चमचा हळद – अर्धा लहान चमचा बेकिंग सोडा किंवा इनो – 1 टी-स्पून आलं – 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर – पाव वाटी बटर किंवा तेल – आवश्यकतेनुसार पुरवठा संख्या (Servings) : मध्यम आकाराचे 5 मूंगलेट तयारीस…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली अध्याय दुसरा अर्जुन उवाच – कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन । इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥4॥ देवा हें येतुलेवरी । बोलावें नलगे अवधारीं । आधीं तूंचि चित्तीं विचारीं । संग्रामु हा ॥30॥ हें झुंज नव्हे प्रमादु । एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु । हा उघडा लिंगभेदु । वोढवला आम्हा ॥31॥ देखें मातापितरें अर्चिजती । सर्वस्वें तोष पावविजती । तियें पाठीं केवीं वधिजती । आपुलां हातीं ॥32॥ देवा संतवृंदु नमस्कारिजे । कां घडे तरी पूजिजे…

Read More

रश्मी परांजपे भाग – 2 मागील लेखात आपण शाळा प्रवेशानंतरची पालकांची जबाबदारी काय असते, याविषयी काही निवडक मुद्दे अभ्यासले. या लेखात आपण सदर विषयावरील आणखीन काही मुद्द्यांवर ऊहापोह करणार आहोत. मुलाची शाळेतील उपस्थिती शाळा सुरू झाल्यानंतर सबळ कारण असल्याशिवाय मुलाला गैरहजर ठेऊ नये. तथापि, मुलाला गैरहजर ठेवण्याची गरज वाटल्यास शिक्षिकेला पूर्व-कल्पना द्यावी. मुलाच्या आजारपणात साहजिकच शाळेत जायला जमणार नाही. अशा परिस्थितीत मुलाला औषधोपचार तसेच विश्रांतीची गरज असते. महत्त्वाची बाब म्हणजे, मुलाला पूर्ण बरे वाटल्याशिवाय शाळेत पाठवू नये. तसेच ठोस कारण असल्याशिवाय मुलाला शाळा सुटण्यापूर्वी शाळेतून घरी नेऊ नये. मुलाला स्वच्छतेची सवय आपल्या मुलाला शाळेत शी-शू लागल्यावर सांगण्याची सवय लावावी. तसेच,…

Read More