Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
अनिता बाळकृष्ण वैरागडे मागील लेखात आपण काही आसनं आणि त्याचे फायदे बघितले होते. आता या लेखात आणखी काही आसनं आणि त्याचे फायदे पाहुयात. अर्ध हलासन अर्ध हलासन करताना पाठीवर सरळ झोपायचे. दोन्ही हात कमरेच्या बाजूला, तळवे जमिनीवर ठेवायचे. दोन्ही पाय हळूहळू वर उचलताना दीर्घ श्वास घ्यायचा आणि काही सेकंद थांबून हळूहळू श्वास सोडत पाय जमिनीवर ठेवायचे. फायदे – शरीराची लवचिकता वाढते, श्वसनक्षमता वाढते. पोटाची कार्यक्षमता वाढते. पूर्ण हलासन हलासन हे प्रचलित आसन असले तरी त्याचा उल्लेख हठयोगाच्या कुठल्याच ग्रंथात नाही. 150 वर्षांपूर्वी जयतराम लिखित ग्रंथात ‘हालीपाव आसन’म्हणून वर्णन मिळते जे थोडेफार सध्याच्या हलासनाशी जुळते. त्यामुळे हलासन हे 150 वर्षांपूर्वी शोधले…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पहिला एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन । अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते॥35॥ हे वरी भलतें करितु । आतांचि एथें मारितु । परि आपण मनें घातु । न चिंतावा ॥225॥ त्रैलोक्यींचें अनकळित । जरी राज्य होईल एथ । तरी हें अनुचित । नाचरें मी ॥226॥ जरी आजि एथ ऐसें कीजे । तरी कवणाचां मनीं उरिजे । सांगे मुख केवीं पाहिजे । तुझें कृष्णा ॥227॥ निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन । पापनेवाश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः ॥36॥ जरी…
शीला जोशी साहित्य पडवळ – अर्धा किलो फोडणीसाठी तेल, मोहरी, एक छोटा चमचा हिंग सारणासाठी ओलं खोबरं – एक मोठी वाटी बेसन (चण्याचं पीठ) – अर्धी मोठी वाटी कोथिंबीर – अर्धी मोठी वाटी हळद – अर्धा टी-स्पून तिखट – दोन टी-स्पून गोडा मसाला – एक टेबलस्पून मीठ – चवीनुसार साखर – थोडीशी पुरवठा संख्या (Servings) : 4 जणांसाठी तयारीस लागणारा वेळ : 15 मिनिटे शिजवण्याचा वेळ : 10 मिनिटे एकूण वेळ : 25 मिनीटे कृती पडवळ स्वच्छ धुवून पुसून घ्या. नंतर त्यांची सालं काढून टाका. सोललेल्या पडवळाचे जवळपास एक इंच लांबीचे तुकडे करून त्याच्या आतील बिया आणि इतर गर…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पहिला तरी आम्हीं कां जन्मावें । कवणालागीं जियावें । जें वडिलां यां चिंतावें । विरुद्ध मनें ॥214॥ पुत्रातें इप्सी कुळ । तयाचें कायि हेंचि फळ । जे निर्दाळिजे केवळ । गोत्र आपुले ॥215॥ हें मनींचि केविं धरिजे । आपण वज्राचेयां बोलिजे । वरी घडे तरी कीजे । भलें एयां ॥216॥ आम्हीं जें जें जोडावें । तें समस्तीं इहीं भोगावें । हे जीवितही उपकारावें । काजीं यांचां ॥217॥ आम्ही दिगंतीचे भूपाळ । विभांडूनि…
रश्मी परांजपे भाग – 1 मागील लेखात आपण पूर्व-प्राथमिक शालेय प्रवेशाची पूर्व-तयारी अभ्यासली. शाळेत प्रवेश जरी आपल्या मुलासाठी घेतला असला, तरी पालक या नात्याने आपली खरी परीक्षा सुरू होते. आता आपण या आणि पुढील लेखांमधे शाळा प्रवेशानंतरची पालकांची जबाबदारी काय असते, या विषयाच्या निवडक मुद्द्यांवर ऊहापोह करणार आहोत. पालकांची जबाबदारी : काही निवडक मुद्दे पालकांची मानसिक तयारी आपलं बाळ आता शाळेत जाणार, इतके दिवस चोवीस तास आपल्याबरोबर असलेलं आपलं बाळ आता दिवसातील दोन-तीन तास आपल्यापासून लांब असणार, या दुराव्याच्या कल्पनेनेच आईचा जीव कासावीस होतो. शाळेच्या सुरुवातीच्या काही दिवसांत तर मुलाला शाळेत सोडल्यावर आईच रडवेली होते. शिवाय मुल रडायला लागलं की,…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पहिला हे आदिपुरुषाची माया । ब्रह्मेयाहि नयेचि आया । म्हणऊनी भुलविला ऐकें राया । संजयो म्हणे ॥203॥ अवधारीं मग तो अर्जुनु । देखोनि सकळ स्वजनु । विसरला अभिमानु । संग्रामींचा ॥204॥ कैसी नेणों सदयता । उपनली येथे चित्ता । मग म्हणे कृष्णा आता । नसिजे एथ ॥205॥ माझें अतिशय मन व्याकुळ । होतसे वाचा बरळ । जे वधावे हे सकळ । येणें नांवें ॥206॥ निमितानि च पश्यामि विपरीतानि केशव । न च…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पहिला दृष्ट्वेनं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थिताम् ।।28॥ सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति । वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ।।29।। गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक् चैव परिदह्यते । न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ॥30॥ तो म्हणे अवधारीं देवा । म्यां पाहिला हा मेळावा । तंव गोत्रवर्गु आघवा । देखिला एथ ॥193॥ हे संग्रामीं अति उद्यत । जाहाले असती कीर समस्त । पण आपणपेयां उचित । केवीं होय ॥194॥ येणें नांवेंचि नेणों कायी…
डॉ. सारिका जोगळेकर आपले शरीर फक्त हाडं, स्नायू आणि अवयवांनी बनलेलं नाही – त्यामागे एक सूक्ष्म, पण अत्यंत प्रभावी अशी शक्ती असते, ती म्हणजे प्राणशक्ती (VITAL FORCE). ही शक्ती आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला कार्य करण्याची ऊर्जा देते, त्यामुळे सर्व क्रियाशीलता नियंत्रित राहते. आपल्या हृदयाचे ठोके, श्वासोच्छ्वास, पचनक्रिया, रोगप्रतिकारक शक्ती आणि एकूणच शरीरातील समतोल राखण्याचे कार्य ही प्राणशक्ती (vital force) करते. Vital force ही संकल्पना होमिओपॅथीमध्ये मूलभूत मानली जाते. होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमॅन यांनी vital force ही संकल्पना मांडली होती. निरोगी असणं म्हणजे नेमकं काय? आरोग्य म्हणजे शांत प्राणशक्तीचे संगीत. जेव्हा ते सुरेल असते तेव्हा शरीर निरोगी असते. “जेव्हा आपले…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पहिला बहुतकरूनि कौरव । हे आतुर दुःस्वभाव । वांटिवावीण हांव | बांधिती झुंजीं ॥172॥ झुंजाची आवडी धरिती । परी संग्रामीं धीर नव्हती । हें सांगोन रायाप्रती । काय संजयो म्हणे ॥173॥ संजय उवाच : एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत । सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ॥24॥ आइका अर्जुन इतुकें बोलिला । तंव कृष्णें रथु पेलिला । दोहीं सैन्यांमाजीं केला । उभा तेणें ।।174।। भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् । उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरूनिति ||25|| तत्रापश्यत् स्थितान्…
लीना जोशी परुळेकर मागच्या लेखात आपण कुठल्या त्वचा प्रकारासाठी कुठली उत्पादने वापरावीत, ते पाहिले. आता आपण पारंपरिक घरगुती उपाय बघूया, जे आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतात. आपल्याकडे नवजात बालकाला आंघोळ घालताना बेसन पीठात दूध मिसळून ते त्या बालकाच्या अंगाला चोळतात. तसेच, साबणाचा शोध लागण्यापूर्वी स्त्री, पुरुष आंघोळीसाठी उटण्याचा वापर करायचे. ती परंपरा पुढे नेत आपण अजूनही दिवाळीत का होईना, पण उटणे लावून आंघोळ करतो. आपल्याकडे आयुर्वेदात विविध प्रकारची उटणी बनवायच्या प्रक्रिया लिहिलेल्या आढळतात. घरगुती साहित्य वापरून बनवलेले Mask हे आपल्या त्वचेवर वेगवेगळ्या पद्धतीने फायदेशीर ठरतात. काही Maskमुळे त्वचेवर Cleansing effect होतो; म्हणजेच त्वचा स्वच्छ होते. काहींमुळे वाफ घेतल्यावर रंध्रे खुली…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- Blog 1
- अध्यात्म 240
- अवांतर 171
- आरोग्य 88
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 181
- मैत्रीण 16
- ललित 499
- वास्तू आणि वेध 353
- शैक्षणिक 72
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
