Author: Team Avaantar

आराधना जोशी पुल स्पर्श होताच दुःखे पळाली, नवा सूर, आनंदयात्रा मिळाली, निराशेतून माणसे मुक्त झाली, जगू लागली, हास्यगंगेत न्हाली असं वर्णन कवी मंगेश पाडगावकर यांनी ज्यांच्याबद्दल केलं आहे, त्या पु. लं.ना जाऊन आज 25 वर्षे झाली. 8 नोव्हेंबर 1919 साली जन्मलेल्या पु. लं.मध्ये थक्क करणारं गुणांचं वैविध्य तर होतंच, पण त्या प्रत्येक गुणात गाठलेला अभिनंदनीय दर्जा, विस्मित करणारी लोकप्रियता आणि या सर्वांपलिकडे जाऊन झगमगणारं नैतिक तेज तसेच माणुसकी कायमच दिसून आली. अशा या पुलंना दोन मिनिटांसाठी प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला होता तो रत्नागिरीच्या समुद्रकिनारी. कोळंब्याहून रत्नागिरीला होडीने प्रवास करून आम्ही किनाऱ्याला लागत होतो आणि समोर साक्षात सुनीताबाई आणि पुलं. त्यांनीही…

Read More

अजित गोगटे कल्याण येथे माझे वास्तव्य आणि नोकरी मुंबईत. सन 1978 ते सन 2020 अशी तब्बल 42 वर्षे मी कल्याण ते बोरिबंदर (आताचे सीएसएमटी) अशी दैनंदिन ये-जा मध्य रेल्वेच्या लोकलने केली. कल्याण ते बोरिबंदर हे रेल्वेचे अंतर 56 किमी आहे. मी सरासरी महिन्याला 25 दिवस कामावर गेलो, असे गृहित धरले तरी, या काळात मी लोकलने केलेल्या एकूण प्रवासाचे अंतर 14 लाख 11 हजार 200 किमी एवढे होते. परंतु मध्यंतरीची सलग 12 वर्षे मी तिकीट किंवा मासिक / त्रैमासिक पास न काढता हा लोकलचा प्रवास केला. म्हणजे, माझा विनातिकिट केलेला प्रवास सुमारे चार लाख तीन हजार 200 किमी एवढा होता. मी…

Read More

यश:श्री मे महिना अर्धा सरल्यावर सर्वांनाच पावसाचे वेध लागतात अन् हवामान खात्याने सांगितलेल्या अंदाजाप्रमाणे मान्सूनची वाटचाल सुरू असल्याचे समजल्यावर पावसाचे तुषार अंगावर उडाल्यासारखे वाटते. यावर्षी पावसाचं आगमन लवकरच झालंय. उन्हाचा चटका वाढलेला असतानाच बरसणाऱ्या थेंबानं एक आल्हाददायक अनुभव सर्वांना दिला. तसं पाहिलं तर पावसात भिजायला कोणाला आवडत नाही? आकाशात काळे ढग जमले आणि गार वारे वाहू लागले की, सर्व ताणतणाव क्षणात निघून जातात. आता जलधारा कोसळणार आणि मन मोहून टाकणारा मातीचा सुगंध सर्वत्र दरवळणार… अशा वेळी आठवते कविवर्य बा. भ. बोरकर यांची कविता – टप टप टप पडती थेंब, मनी वनीचे विझती डोंब वत्सल ये वास, भूमी आशीर्वच बोले गडद…

Read More

आराधना जोशी “हल्लीच्या पिढीवर काहीही संस्कार झालेले नसतात,” हे वाक्य आजकाल सर्रास ऐकायला मिळतं. पण ते कितपत योग्य आहे, याचा विचार आपण करतो का? तसं बघायला गेलं तर, माणसाच्या अनेक पिढ्या हेच वाक्य ऐकत मोठ्या झाल्या आहेत. तरीही, संस्कार म्हणजे नेमकं काय? याची व्याख्या अजूनही आपल्याला करता आलेली नाही, हेच खरं. पूर्वी ‘सातच्या आत घरात’ येणं बंधनकारक होतं. नव्हे, तो संस्कारांचा भाग होता. हा संस्कार जो मुलगा किंवा मुलगी काही कारणांमुळे पाळत नव्हते ते संस्कार विसरले, असाच शिक्का त्यांच्यावर मारला जायचा. हल्ली महानगरांमधून ऑफिसेस सुटल्यावर किंवा अन्य कारणांमुळे घरी पोहोचायला साडेआठ-नऊ तरी वाजतात. त्यामुळे तिन्ही सांजेला देवासमोर दिवा लावून ‘शुभं करोती’ म्हणणं आता अनेकदा नसतं. थोरामोठ्यांना खाली…

Read More

चंद्रशेखर माधव माझा जन्म पुण्यातच 1975 साली झाला. ही साधारण 1985 ते 1987च्या दरम्यानची गोष्ट आहे. पहिल्यापासूनच शालेय शिक्षण नूतन मराठी विद्यालयात झाले. राहायला पर्वती परिसरात असल्यामुळे इयत्ता 4थीपर्यंत आई शाळेत घ्यायला यायची. ये-जा करायचे साधन म्हणजे बस. रिक्षा नव्हत्या असं नाही, पण रोज रोज रिक्षाप्रवास परवडणारा नव्हता. इयत्ता पाचवीनंतर मात्र आम्ही आपले-आपले स्वतंत्ररीत्या शाळेत ये-जा करू लागलो. आमच्यासोबत आमच्यापेक्षा तीन-चार वर्षांनी मोठे असे आमच्याच कॉलनीत राहणारे चार-पाच जण असायचे त्यामुळे तशी काळजी नव्हती. माझ्याच शाळेत शिकणारा, पण माझ्यापेक्षा एक वर्षांनी लहान असणारा माझा मित्र विशाल आणि मी, असे आम्ही दोघे रोज मिळून बसने ये-जा करायचो. आम्ही साधारण एकाच वयाचे…

Read More

आराधना जोशी आम्ही मूळचे जळगावचे. पण बाबांच्या नोकरीमुळे मुंबईत लहानाचे मोठे झालो. रेल्वेच्या नोकरीमुळे मुंबईतल्या मुंबईतही घरं बदलावी लागली. मात्र ही सगळी घरं, मुंबईत जास्त पाऊस पडल्यावर ज्या ज्या सखल भागात पाणी साठतं, तिथल्या परिसरात होती. उदाहरणार्थ, ग्रान्ट रोड, माटुंगा रोड… त्यामुळे आईची पावसाळ्यासाठीची तयारी कायम लक्षात राहिली. आज माझ्या संसारात ती कायम मदतीला येते. पावसाळ्याच्या किमान चार महिने दुधाची पावडर घरी असायलाच पाहिजे. त्यामुळे दुधाचा प्रश्न निर्माण झाला तरी घरी एक पर्याय तयार असेल. मी पण आता पावडर आणून ठेवते. पण त्याच्या बरोबरीने रेडिमेड चहाची पाकिटंही भरून ठेवते. (नवऱ्याचा आग्रह) अमावस्या, पौर्णिमा असतील तर पावसाचा जोर वाढतो. त्यामुळे घरात…

Read More

संगीता भिडे (कमल महाबळ) माझ्या वयाचा पैलतीर जसजसा जवळ सरकतोय तसतसा अनेक आठवणींचा, प्रसंगांचा पिंगा मनात आणि मस्तकातही का सुरू झाला आहे, कळत नाही. काही आठवणी सुखद, काही दुःखद तर काही विचार करायला लावणाऱ्या… अंथरुणाला पाठ टेकली की, आठवणींचा पिंगा सुरू होतो आणि मग ते व्यक्त केल्याखेरीज चैन पडत नाही. असाच एक प्रसंग – रोज दाराशी पेपर टाकणाच्या मुलाचा. या घटनेला आता 30-40 वर्षे झाली. पण अजूनही ती विसरता येत नाही. साधारण 22-23 वर्षांचा हा मुलगा, नित्यनेमाने आमच्या घरी पेपर टाकत असे. हा मुलगा वर्णाने गोरा, दिसायला उमदा आणि हुशार बाटेल असा… ब्राह्मण कुळातला वाटेल असा. मला प्रश्न पडे, हा…

Read More

सुहास गोखले (निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष) अनेकदा राजकीय पक्षांच्या वादात आपण एखाद्याची नार्को टेस्ट करावी, असा उल्लेख ऐकतो, वाचतो. याच पॉलीग्राफ आणि Narco Analysis Test बद्दल थोडी प्राथमिक माहिती आज पाहुया. आरोपी पकडल्यावर त्याच्याकडे पुरावे शोधण्याच्या चौकशीत पोलिसांच्या कुप्रसिद्ध थर्ड डिग्री मेथडला पर्याय म्हणून या टेस्ट योग्य ठरतात; मात्र कायद्यानेही या टेस्टना मर्यादा आहेत. यात मुख्य तीन प्रकारच्या टेस्ट असतात – Polygraph test Narco analysis Brain Electro Oscillatory Signature Profile यातील नार्को ॲनलिसीस टेस्ट ही वैद्यकीय देखरेखीखालीच पार पडते; कारण यात व्यक्तीच्या शरीरात सोडियम पेंटोथल नावाचे नार्कोटिक ड्रग टोचतात. या ड्रगचा मेंदूवर परिणाम झाला की, ती व्यक्ती…

Read More

आराधना जोशी इलेक्ट्रॉनिक मीडियात काम करत असताना अनेक दिग्गज मंडळींना भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती. त्यातलंच एक नाव म्हणजे खगोलभौतिकशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर. 20 मे 2025 रोजी या शास्त्रज्ञ, लेखकाच्या निधनाची बातमी ऐकली आणि त्यांच्याशी साधलेल्या संवादाची घटना डोळ्यांसमोर उभी राहिली. 1999 साली अल्फा मराठी (आताचे झी मराठी) हे मराठीतले पहिले खासगी चॅनल सुरू झाले होते. निवडणुकांची धामधूम नुकतीच आटोपली होती आणि त्यामुळे बातम्यांसाठी आता इतर विषयांवर लक्ष द्यायला सुरुवात झाली. त्यातच मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील संकुलात डॉ. जयंत नारळीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची बातमी आली. कार्यक्रम खरंतर विज्ञानाशी निगडीत होता. त्यामुळे तो कव्हर करायला आपल्याला…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 2 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 23 मे 2025 वार : शुक्रवार तिथि : एकादशी 22:30 नक्षत्र : उत्तराभाद्रपदा 16:02 योग : प्रीति 18:36 करण : बव 11:54 सूर्य : वृषभ चंद्र : मीन सूर्योदय : 06:01 सूर्यास्त : 19:08 पक्ष : कृष्ण पक्ष मास : वैशाख ऋतू : वसंत सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 अपरा : एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष केशवराव भोळे जयंती मराठी रंगभूमीवर आपल्या संगीताची मोहिनी घालणाऱ्या केशवराव भोळे यांचा जन्म 23 मे 1896 रोजी…

Read More