Author: Team Avaantar

मनोज जोशी सिनेउद्योग हा अनेकांचा चरितार्थ चालविणारा महत्त्वाचा उद्योग आहे. याची खासियत अशी की, या उद्योगातील निर्मितीमध्ये विविध उद्योगांचे प्रतिबिंबही पाहायला मिळते. काही गाणी तर या उद्योगांना अधोरेखित करणारी आहेत. मागील लेखांमध्ये आपण अशा मराठी गाण्यांचा आढावा घेतला होता. यावेळी आपण हिंदी गाणी पाहूयात. वास्तवात रोजगार, उद्योगाची पहिली पायरी म्हणजे, बेरोजगारी. यावरही काही गाणी आहेत, जी लोकप्रियही झाली आहेत. सर्वात आधी उल्लेख करावा लागेल तो, विनोद खन्ना याच्या ‘मेरे अपने’ चित्रपटातील ’हालचाल ठीकठाक हैं…’ या गाण्याचा. नंतर सलमान खान अभिनीत ‘जागृती’ सिनेमातील ’हम सारे बेकार…’ हे गाणे लोकप्रिय झाले होते. मग बूट पॉलिशने सुरुवात होते. ‘बूट पॉलिश’ चित्रपटातील ‘ठहर जरा ओ…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते! पुन्हा एकदा तुमच्या भेटीला… एक ऑडिशन आणि त्यावेळची ही आठवण! एका हिंदी सीरियलच्या ऑडिशनसाठी मला कॉल आला. “लग्नाचा सीक्वेन्स आहे… छान साडी, ज्वेलरी, गजरे आणि मेकअप करून या…”, असं मला सांगण्यात आलं. मी त्यांना ‘ओके’ म्हटलं आणि छान तयार होऊन ऑडिशनला गेले. ‘इनऑर्बिट मॉल’च्या (Inorbit Mall) पाठीमागे एका बिल्डिंगमध्ये त्यांचं ऑफिस होतं. ऑडिशन मस्त झाली. ऑफिसमधून बाहेर पडून खाली उतरले, तो चांगलाच अंधार झाला होता. आतासारखी तिथे डेव्हलपमेन्ट झाली नव्हती. संध्याकाळी 6-7 वाजता ऑफिसेस सुटली की, त्यानंतर रस्त्यावरील वर्दळही हळूहळू कमी होत असे. गाड्या, रिक्षा, माणसं… फारच तुरळक होती. मी खाली ऑटोची वाट पाहात होते…

Read More

सुरेश महाबळ आज गुरू पौर्णिमा… मला अनेक गुरुजनांचा सहवास आणि सेवा करण्याची संधी मिळाली. अशाच एका महान गुरूंची आठवण मी आज सांगणार आहे. शैक्षणिक तफावत असून सुद्धा माझ्या वाचनाची आवड लक्षात घेऊन अनेक विषयांवर त्यांच्यासोबत चर्चा करण्याची संधी मला मिळाली. त्यांनी पण माझी पाठ थोपटून माझ्याकडून अनेक पुस्तके स्वतःच्या संदर्भासाठी वापरली. हे गुरू म्हणजे प्रा. म. मो. केळकर. अत्यंत स्वच्छ वर्तन, उंची जेमतेम पाच फूट, वर्ण गोरा, केस मागे फिरविलेले – त्यामुळे कपाळ मोठे दिसायचे. निळे डोळे समोरच्याचा वेध घेणारे. अंगावर कायम आवडता पेहराव म्हणजे झब्बा आणि पायजमा… ते एम. जे. कॉलेज, जळगाव येथे संस्कृत विभागाचे प्रमुख होते. जळगाव, धुळे,…

Read More

डॉ. किशोर महाबळ “सर, आम्ही शाळेत असल्यापासून अनुभव घेत आलो आहोत की, कोणताही शिक्षक किंवा शिक्षिका सामान्यतः विद्यार्थ्यांवर टीका करण्याची एकही संधी वाया घालवत नाही. याउलट, गेली काही वर्षे आम्ही बघतोय की, तुम्ही शिक्षक असलात तरी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा विद्यार्थ्यांचे कौतुक करत आहात. वारंवार हे घडत आहे. हे कसं?” एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने प्राध्यापकांना विचारले. प्राध्यापकांनी उत्तर दिले, “याला दोन कारणे आहेत. खूप पूर्वी, मी एक अवतरण वाचले होते ज्यात म्हटले होते, “हजारो प्रतिभा तुमच्या नजरेस पडण्याच्या प्रतीक्षेत आहेत” (“A thousand talents await recognition). दुसरे कारण म्हणजे, मला महान कलाकार, शास्त्रज्ञ, समाजसुधारक, विद्वान, तत्वज्ञ आणि लेखकांची चरित्र तसेच…

Read More

मनोज जोशी नियमित आयुष्यात तुमचं प्रोफेशन कुठे ना कुठे तरी डोकावतंच. साधारणपणे 25-30 वर्षांपूर्वी विजय पाटकर दिग्दर्शित ‘हलकं फुलकं’ नाटक रंगभूमीवर आलं होतं. त्यावेळी ते खूप लोकप्रियही झालं होतं. या नाटकात विजय कदम, रसिका जोशी आणि नंदू गाडगीळ हे तीनच कलावंत होते. त्यापैकी नंदू गाडगीळ हा सूत्रधार. तर, विजय कदम यांनी या नाटकात सहा तर, रसिका जोशी यांनी पाच वेगवेगळी पात्रं रंगवली होती. दुर्दैवानं, आज हे दोन्ही कलावंत हयात नाही. सांगायचा मुद्दा हा की, या नाटकात रसिका यांनी केशकर्तनालयच्या मालकाच्या पत्नीची भूमिका केली होती. त्यात त्यांचा एक संवाद होता, ‘गप्पा काय दाढीच्या साबणाच्या फेसासारख्या असतात, जेवढ्या फेसाव्यात तेवढा फेस येतो…’…

Read More

डॉ. प्रिया गुमास्ते ‘अरे, किती आइसक्रीम खातोयस? थंडीत बाधेल की…’, आयुर्वेदाची माहिती असणारी आजी आपल्या नातवाला एक प्रकारे ऋतुचर्या समजावत होती. कधी काय खाणे योग्य, काय अयोग्य याची चर्चा बर्‍याच घरांमध्ये होत असते. ऋतुमानानुसार कसे वागावे, काय खावे जेणेकरून आपली प्रतिकारशक्ती वाढेल आणि आपण आजारी पडणार नाही, याचे सखोल मार्गदर्शन आयुर्वेदात केले आहे. ऋतुचर्या म्हणजे काय? ऋतौ ऋतौ आचरणीय: विधि: ऋतुचर्या इति अभिधीयते। वेगवेगळ्या ऋतुनुसार आपल्या आहारविहारात केलेले बदल म्हणजे ऋतुचर्या. यामुळे शरीरातील दोष (वात, पित्त, कफ) संतुलित राहतात आणि आरोग्य चांगले राहते. पण ऋतू म्हणजे काय? आणि कोणता ऋतू सुरू आहे, हे कसे ओळखायचे? मासैर्द्विसङ्ख्यैर्माघाद्यै: क्रमात् षडृतव: स्मृता:। शिशिरोऽथ…

Read More

लीना जोशी परुळेकर मागच्या लेखात आपण त्वचा आणि तिचे प्रकार पाहिले. यावेळी आपण, त्वचेवर कुठल्या गोष्टी परिणाम करतात, ते पाहू. आपल्या त्वचेवर अंतर्गत आणि बाह्य गोष्टींचे परिणाम होत असतात. यातील अंतर्गत बदल हे मुख्यत्वे करून Hormones च्या बदलामुळे होत असतात, या बदलांमुळे तुमची त्वचा अतितेलकट होऊन त्यावर मुरुमे येऊ शकतात किंवा त्वचा अतिकोरडी होऊन Hyperpigmentation सारख्या गोष्टींना तोंड द्यावे लागू शकते. Hormones मध्ये होणाऱ्या बदलाला Puberty, गरोदरपणा, menstrual cycle (मासिक पाळी), menopause इत्यादी अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. अपुरी झोप, चुकीची जीवन शैली, सतत बाहेरचे खाणे, आजारपण या आणि अशा विविध गोष्टी त्वचेवर विपरित परिणाम करतात. बाह्य गोष्टींमध्ये ऋतू बदल,…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते… पुन्हा एकदा तुमच्या भेटीला! आयुष्यात कितीतरी घटना घडतात, आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे गुरू भेटतात. एक खूप जुन्या अभिनेत्री माझ्या आयुष्यात आल्या. उत्तम कलावंत असण्याबरोबरच उत्तम स्वयंपाक बनवणे, खाणे अन् खाऊ घालणे याची त्यांना खूप आवड होती. आणखी एका कलेत त्यांची मास्टरी होती, ते म्हणजे वीणकाम! त्यांचं नाव सुहासिनी आडारकर. मी त्यांना ‘ललू मावशी’ म्हणायची. तुम्हाला ती सीरियल आठवते का? ‘मालगुडी डेज’!… ‘ता ना ना ता ना ना ना…’ हा म्युझिक ट्रॅक त्यावेळी सर्वांच्याच मुखी होता. तुम्ही सुद्धा या तालावर गायलात ना? त्या सीरियलमधला गोड, छोटासा स्वामी आठवतो? आणि त्याला ‘छ्वामी’ म्हणणारी ती गोड आजी… म्हणजे…

Read More

डॉ. किशोर महाबळ परीक्षा नुकत्याच संपल्या होत्या. शिक्षकांसाठी राखीव असलेल्या रूममध्ये बसून एक ज्येष्ठ शिक्षिका उत्तरपत्रिका तपासत होत्या. हे काम सुरू असताना अनेकदा उत्तरपत्रिकेत चूक आढळली की, त्यांच्या तोंडून ‘मूर्ख लेकाचा’ असा शब्द बाहेर पडायचा. प्रत्येक उत्तरपत्रिकेत अशा काहीना काही चुका असायच्याच. त्यामुळे ‘मूर्ख’ हा शब्द अनेकदा त्या खोलीत उमटत होता. जेव्हा जेव्हा या शिक्षिकेला चुकीची उत्तरे आढळायची, त्या प्रत्येकवेळी उत्तराचे जाहीर वाचन त्या खोलीत केले जात होते आणि शेवटी अर्थातच परवलीचा शब्द उमटत होता ‘मूर्ख लेकाचा’. इतर शिक्षक ही उत्तरे ऐकून मोठ्याने हसायचे. कधीकधी त्या शिक्षिका चुकीच्या उत्तरांजवळ ‘मूर्ख’ असा शेरादेखील लिहीत असे. हा सगळा प्रकार एक सर्वात तरुण…

Read More

डॉ. प्रिया गुमास्ते (आयुर्वेदिक फिजिशियन आणि कॅन्सर कन्सल्टंट) सध्याच्या काळात नॅचरल, हर्बल हे शब्द वरचेवर कानावर पडत असतात आणि आयुर्वेद म्हणजे हर्बल औषधी हाच समज बहुतांश लोकांमध्ये आहे. पण आयुर्वेद फक्त तेवढ्यापुरते मर्यादित नाही. मग काय आहे हे आयुर्वेद? आपल्या भारतात सुमारे 5 हजार वर्षांपूर्वी अत्यंत विद्वान ऋषींनी अभ्यासपूर्ण असे वेद लिहिले. वेद म्हणजे ज्ञान देणारे ग्रंथ. त्यामधील एक उपवेद म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेद या शब्दाची फोड केली तर ती होते आयुषो वेदः| यातील आयु म्हणजे जीवन तर, वेद म्हणजे विज्ञान. थोडक्यात सांगायचे झाले तर, आयुष्याविषयी माहिती देणारा, जीवनाचे विज्ञान उलगडून देणारा ग्रंथ म्हणजे ‘आयुर्वेद’! हिताहितं सुखं दुःखमायुस्तस्य हिताहितम्। मानं च…

Read More