Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
कामिनी व्यवहारे केळफुलाची स्वादिष्ट भाजी तयार होते, हे सर्वांनाच माहीत आहे. पण काही असेही आहेत, ज्यांना या केळफुलाची माहिती नसेल. केळ्यांच्या घडाने आकार घेतला म्हणजे त्याच्या टोकाला असलेले केळफूल त्या घडातील केळ्यांच्या शेवटच्या फणीपासून थोड्या अंतरावर कापून काढून घेतात. त्याच केळफुलाचा भाजीसाठी उपयोग होतो. शिवाय ते काढून घेतल्यामुळे घडातील केळी चांगली पोसून त्यांचे वजन वाढते. आरोग्याच्या दृष्टीने केळफूल फायदेशीर आहे. यात अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. यात फायबर, प्रथिने, पोटॅशिअम, कॅल्शियम, तांबे, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम आणि ई जीवनसत्त्व असते, असे तज्ज्ञ सांगतात. याच केळफुलाचे खमंग वडेही तयार करता येतात. पाहूयात त्याची रेसिपी – पुरवठा संख्या – 4 ते 5 व्यक्तींसाठी साहित्य…
नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते…! पुन्हा एकदा तुमच्या भेटीला… हल्ली वेगवेगळे डेज (days) आपण साजरे करतो… काही लोक म्हणतात, ‘नसती कौतुकं!’ मला मात्र हे असले सगळे डेज् साजरे करायला आवडतात… असाच एके दिवशी माझ्या आयुष्यात ‘मदर्स डे’ आला. माझ्या लेकी म्हणाल्या, ‘आवडे (लाडात आल्या की, आईची ‘आवडी’, ‘आवडे’ होत असते!) आज आपण तुझ्यासाठी शॉपिंग करूयात.’ शॉपिंग म्हटलं की, मी नेहमीच खूश असते. आम्ही तिघी निघालो… मॉलमध्ये गेलो… ‘Factory outlet’ जिथे 3500 ते 4000 रुपयांची जीन्स आम्हाला दीड हजार रुपयांना मिळाली. वेगवेगळ्या खूप जीन्स ट्राय केल्यानंतर मुलींना एक जीन्स परफेक्ट वाटली! काऊंटरवर गेलो, तशा लेकी म्हणाल्या, “हां, आई दे पैसे!” मनात…
रश्मी परांजपे ‘प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी’ या मालिकेअंतर्गत मागील लेखात आपण पालकांच्या माहितीसाठी आणि पूर्ततेसाठी विद्यार्थीसंबंधित माहितीपत्रक तयार करताना समाविष्ट करावयाचे महत्त्वाचे निवडक मुद्दे जाणून घेतले. या लेखात आपण शाळेतील तसेच मुलांची स्वच्छता याविषयी माहिती घेणार आहोत. शाळा हे विद्येचे मंदिर आहे, असे आपण मानतो. त्यामुळे शाळा मंदिराप्रमाणेच स्वच्छ असणे नितांत गरजेचे आहे. तद्वतच, शाळेतील विद्यार्थ्यांच्या निरामय आरोग्यासाठी त्यांची स्वच्छतादेखील अत्यंत महत्त्वाची आहे. आता आपण एकंदरीत स्वच्छतेसंबंधित काही मुद्दे जाणून घेऊयात. शाळेचे प्रवेशद्वार आकर्षक रचनेचे तसेच चांगल्या पद्धतीने रंगवलेले असावे. शिवाय, ते नेहमीच धुवून-पुसून धूळरहित आणि स्वच्छ ठेवावे. असे प्रवेशद्वार बघितल्यावर शाळेत प्रवेश करताना सर्वांचे मन सदैव प्रसन्न राहील. शाळेत वर्गाबाहेरील…
माधवी जोशी माहुलकर विदर्भात, विशेषतः बुलढाणा जिल्ह्यात गणपतीचे किंवा नवरात्रीचे भंडारे असोत, घरातील लग्नकार्य किंवा वाढदिवस असोत अशावेळी जेवणात मिरचीची भाकरी, भाजी ही आपले अव्वल स्थान टिकवून ठेवते. विशेषतः, ग्रामीण भागांमध्ये अशा कार्यक्रमांत मिरचीची भाजी आणि भाकरी आवर्जून केली जाते. इतकेच नाही तर, सुगीच्या दिवसांत तर शेतांमधून, मळ्यांमधून या मिरचीची भाजी आणि भाकरीच्या पार्ट्या होतात. मिरचीची भाजी ही थोडी पातळसर असते. अतिशय चविष्ट अशा या भाजीत भाकरी कुसकरून खाण्याची मजा कुछ औरच आहे. ही मिरचीची भाजी-भाकरी ज्याने एकदा चाखली तो याचा जबरदस्त फॅन होतो. या भाजीकरिता विदर्भातील अनेकजण स्वतः तर अशा पार्ट्या, भंडारे, लग्नांमध्ये हजेरी लावतातच, शिवाय आपल्या कुटुंबातील लोकांकरिता…
डॉ. किशोर महाबळ शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेत परीक्षक म्हणून गेल्यावर अनेकदा असे लक्षात आले की, शेकडो विद्यार्थी असलेल्या शाळांतून दरवेळेस तेच तेच विद्यार्थी स्पर्धक म्हणून पाठविले जातात. वक्तृत्व गुण असलेले शाळेतील एक-दोन विद्यार्थी निवडले की, शाळेतील शिक्षकांना समाधान वाटते आणि मग तेच-तेच विद्यार्थी स्पर्धेत पाठविले जातात. वक्तृत्व गुण असलेले विद्यार्थी शोधण्याचा शाळांनी जर नीट प्रयत्न केला तर, प्रत्येक शाळेत अगदी सहजगत्या असंख्य विद्यार्थी सापडतील. शाळेतील प्रत्येक मुला-मुलीला आपले विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली तर, हे असंख्य विद्यार्थी सहजगत्या सापडतील. मात्र, त्यासाठी सर्वांना अशी संधी मिळावी, असा विचार शाळांतील शिक्षकांना करावा लागेल. शाळेतील सर्व मुला-मुलींना संधी मिळेल, अशी व्यवस्थाच आपण निर्माण…
माधवी जोशी माहुलकर नवरात्रौत्सव म्हटलं की, मला आठवतो तो लहानपणी आमच्या घराजवळील रेणुका मातेच्या मंदिरात नित्यनेमाने येणारा पोतराज! हा शब्द तमिळ भाषेतील पोत्तुराजू या शब्दाचा अपभ्रंश होऊन पोतराज म्हणून रूढ झाला. दक्षिणेत ‘सात बहिणी’ म्हणून ग्रामदेवता पूजल्या जातात; त्यांचा पोतराज हा भाऊ आहे, अशी लोकमान्यता आहे. त्याच्या हातातील सोट्याला (चाबूक) ‘कडक’ असे म्हटले जात असल्यामुळे तो गावात आला की, ‘कडकलक्ष्मी आली’, असंही त्यांना संबोधले जायचे. स्वतःच्याच पाठीवर आसूड ओढणारा पोतराज पाहिला की, तेव्हा त्याची भीती वाटत असे… जसजसे मोठी होत गेले तशी ही भीती नाहीशी होऊन त्याची जागा कुतूहलाने घेतली. त्याच्या गळ्यात रंगबीरंगी मण्यांच्या माळा, कधी कवड्याची माळ ज्यामधे देवीचा…
आराधना जोशी पुरवठा संख्या – 4 व्यक्तींसाठी दूध मसाल्याचे साहित्य बदाम – अर्धी वाटी काजू – अर्धी वाटी पिस्ता – पाव वाटी हिरवी वेलची – 20 ते 25 (वेलची किती लहान किंवा मोठी आहे, त्यानुसार किती घ्यायची हे ठरवावे) केशर – 15 ते 20 काड्या किसलेले जायफळ – पाव टीस्पून हळद – 1 टेबलस्पून मिल्क पावडर – 2 टेबलस्पून (पूर्णपणे ऐच्छिक, वगळली तरी चालेल) तयारीस लागणारा वेळ : बदाम, काजू, पिस्ता भाजायला – 5 ते 7 मिनिटे भाजलेले बदाम, काजू, पिस्ता थंड व्हायला – 30 मिनिटे वेलची सोलायला – 5 मिनिटे मसाला करायला – 2 मिनिटे एकूण कालावधी – अंदाजे…
डॉ. प्रिया गुमास्ते आयुर्वेदिक फिजिशियन आणि कॅन्सर कन्सलटन्ट वर्षा हा मोहक पावसाचा ऋतू श्रावण आणि भाद्रपद महिन्यांत भारतीय उपखंडात पसरतो. (Mid-June to Mid-September). वर्षा ऋतू हा जलतत्वाशी संबंधित आहे. हा पोषण, पुनरुज्जीवन आणि परिवर्तनाचा काळ आहे. या ऋतूमध्ये वातावरण आणि पर्यावरणाच्या गुणांमध्ये लक्षणीय बदल होतात, ज्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पाऊस हा एक नैसर्गिक शुद्धीकरण करणारा आहे, म्हणून हा ऋतू शुद्धीकरण आणि विषमुक्तीचा काळ मानला जातो. तो वातावरण आणि पृथ्वीवरील विषारी पदार्थ आणि अशुद्धता धुऊन टाकतो. या ऋतूत अनेक औषधी वनस्पतींची लागवड केली जाते. दोष आणि ऋतू वर्षा ऋतू हा काळ वात दोषाच्या प्रकोपाचा असून या…
रविंद्र परांजपे आत्तापर्यंतच्या सर्व लेखांमध्ये आपण निरामय आरोग्य या संकल्पनेबद्दल सविस्तर माहिती घेतली. आता आपण निरामय आरोग्याची वाटचाल आरंभ करणार आहोत… आणि या वाटचालीत आपण निरामय आरोग्याचे विविध पैलू जाणून घेणार आहोत. थोडक्यात, निरामय आरोग्य प्राप्तीसाठी तसेच संवर्धनासाठी आपण काय करावे, तसेच आपण काय करू नये, याबाबत सविस्तर आणि सखोल मार्गदर्शन घेणार आहोत. मार्गदर्शनाचा श्रीगणेशा आपण दिनचर्येपासून करूयात. दिनचर्या म्हणजे काय? दिन म्हणजे दिवस आणि चर्या म्हणजे पथ्ये. सोप्या भाषेत दिनचर्या म्हणजे विहार. थोडक्यात, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण करत असलेल्या सर्व कामांचा समावेश दिनचर्येत होतो. आता आपण ‘सकाळी लवकर उठावे’ या लेखाच्या मूळ विषयाकडे वळूयात. हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी…
स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत याच महिला काही नवनवीन क्लृप्त्या वापरतात… याच आहेत. किचन टीप्स. जाणून घेऊयात काही टीप्स – गृहिणींना नॉनव्हेज किंवा रसभाजीसाठी कांद्याची पेस्ट लागते. त्यासाठी तीन-चार कांदे चिरून नंतर ते कढईत भाजून घ्यावे लागतात. भाजल्याने कांद्यातील रस आटतो आणि जीवनसत्त्वे नष्ट पावतात. तसेच चिरणे, भाजणे यात वेळ जातो आणि गॅसही वाया जातो. त्याऐवजी, आपण जेव्हा भातासाठी कूकर लावतो, तेव्हा भाताच्या ताटलीवर कांदे ठेवून द्यावेत. व्यवस्थित उकडले जातात. थंड झाल्यावर त्यांची मिक्सरमध्ये छान पेस्ट होते आणि जीवनसत्त्वेही टिकून राहतात. वेळेची, गॅसची बचत होते आणि रसभाजीला छान चवही येते. मीठ, ओला नारळ, हिरवी मिरची, कोथिंबीर,…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- Blog 1
- अध्यात्म 240
- अवांतर 171
- आरोग्य 88
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 181
- मैत्रीण 16
- ललित 499
- वास्तू आणि वेध 353
- शैक्षणिक 72
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
