Author: Team Avaantar

प्रणाली मंगेश महाशब्दे आज बऱ्याच दिवसांनी घरात गडबड नव्हती. आम्ही दोघे आणि आता आमची दोन मुलं म्हणजे मुलगा आरोह आणि मुलगी स्वरा असे चौघेच घरी होतो. तसे तर, आम्हाला तीन मुलं. मोठी मुलगी राणी जिचे एक महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. तीन महिन्यांपूर्वी लग्न ठरले. लग्न लवकर करायचे असे ठरले होते, कारण मुलाला सुटी नव्हती. तो एक महिन्याची सुट्टी घेऊन येणार होता. लग्न झाल्यावर मुलगी दुसऱ्या घरी यापेक्षा ती दुसऱ्या देशात जाणार, याचे जास्त दु:ख वाटत होते. त्यामुळे खूपच तयारी करायची होती. व्हिसासाठी फिरणे, लग्नाच्या खरेदीसाठी फिरण्यापेक्षा महत्त्वाचे होते. असो, सगळी गडबड संपून आज बऱ्याच दिवसांनी मी निवांत बसले होते. तेवढ्यात…

Read More

माधवी जोशी माहुलकर गणपत वाणी बिडी पितानाचावायाचा नुसतीच काडी;म्हणायचा अन मनाशीच कीया जागेवर बांधिन माडी… बा. सी. मर्ढेकरांची ही अजरामर कविता आपल्याला खूप काही शिकवून जाते. इयत्ता सातवी, आठवीत असताना ही कविता अभ्यासाला होती, पण तेव्हा त्यातील मर्म समजण्याची आमची कुवत नव्हती; पण आता वयाच्या पन्नाशीत जीवनाचे विविध अनुभव घेतल्यानंतर खरा ‘गणपत वाणी’ समजायला लागला. मर्ढेकरांचा गणपत वाणी हा एक विशिष्ट व्यक्तीसमूहाचे प्रातिनिधिक स्वरूप आहे, जो एका विशेष चौकटीमधेच आपले जीवन जगत असतो आणि त्याबाहेर जाऊन फारसे कष्ट न करता सुखासीन आयुष्याचे स्वप्न उराशी बाळगून असतो. त्याचे संपूर्ण आयुष्य फक्त स्वप्नरंजन करण्यातच जातं. आजही असे अनेक ‘गणपत वाणी’ आपल्या अवतीभवती…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा जो बहुवें विषयविलासें गुंफें । तो म्हणती उवायें पडिला सापें । जो अभिलाषभारें दडपे । तयातें सज्ञान म्हणती ॥509॥ जयाचें आयुष्य धाकुटें होय । बळ प्रज्ञा जिरोनि जाय । तयाचे नमस्कारिती पाय । वडिल म्हणोनि ॥510॥ जंव जंव बाळ बळिया वाढे । तंव तंव भोजें नाचती कोडें । आयुष्य निमालें आंतुलियेकडे । ते ग्लानीचि नाहीं ॥511॥ जन्मलिया दिवसदिवसें । हों लागे काळाचियाचि ऐसें । कीं वाढती करिती उल्हासें । उभविती गुढिया ॥512॥ अगा मर हा बोलु न साहती । आणि मेलिया तरी रडती । परि असतें जात न गणिती । गहिंसपणें ॥513॥ दर्दुर सापें गिळिजतु आहे…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय प्राच्यविद्या संशोधक वा. वि. मिराशी टीम अवांतर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय प्राच्यविद्यासंशोधक आणि भारतविद्यातज्ज्ञ वासुदेव विष्णू मिराशी यांचा जन्म 13 मार्च 1893 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील कुवळे (सध्या जि. सिंधुदुर्ग) येथे झाला. त्यांनी मॅट्रिक, बी. ए. आणि एम. ए. या सगळ्या महत्त्वाच्या परीक्षांमध्ये प्रथमवर्ग पटकाविला. त्यांनी सुरुवातीस मुंबईतील शासकीय एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये संस्कृत विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले. या काळात त्यांनी एलएल. बी. पदवी प्राप्त केली. पुढे ते नागपूरच्या महाविद्यालयात नोकरी करू लागले. नागपूरमधील ‘विदर्भ संशोधन मंडळʼ या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. या संस्थेचे ते कार्याध्यक्ष होते. या माध्यमातून त्यांनी इंग्रजीतील…

Read More

वैद्य विष्णू देविदास सावंत निसर्ग जेव्हा जुनी पाने गाळून नव्या पालवीने नटतो, आम्रवृक्ष जेव्हा मोहराने बहरतात आणि कोकिळेचा कुहू-कुहू स्वर कानी पडतो, तेव्हा समजावे की ‘ऋतूराज’ वसंताचे आगमन झाले आहे. वसंतोत्सव हा केवळ निसर्गाचा उत्सव नसून तो मनाला आणि शरीराला नवचैतन्य देणारा काळ आहे. आयुर्वेदानुसार, प्रत्येक ऋतू आपल्यासोबत शरीरात काही बदल घेऊन येतो. शिशिर ऋतूत (थंडीत) शरीरात साठलेला ‘कफ’ वसंतातील सूर्याच्या उष्णतेने वितळू लागतो. ज्याप्रमाणे हिमालयातील बर्फ वितळून नद्यांना पूर येतो, तसेच शरीरातील कफ वितळल्याने अग्निमांद्य, सर्दी, खोकला, आळस आणि पचनाचे विकार उद्भवू शकतात. आपल्या पूर्वजांनी ‘वसंतोत्सव’ केवळ आनंदासाठी नाही, तर आरोग्यासाठीही आखला आहे. होळीच्या धगीतून मिळणारी उष्णता असो किंवा…

Read More

साहित्य हेही वाचा – Recipe : तंदुरी पनीर कबाब अन् कुरकुरीत भेंडी कृती हेही वाचा – Recipe : अशी वरी तांदळाची खिचडी करून पाहिली आहे का? टिप (‘रुचिरा’ पुस्तकातून साभार) तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा बाप दुःखाचें केणें सुटलें । जेथ मरणाचे भरे लोटले । तिये मृत्युलोकींचिये शेवटिले । येणें जाहालें हाटवेळे ॥496॥ आतां सुखेंसि जीविता । कैंचीं ग्राहिकी कीजेल पांडुसुता । काय राखोंडी फुंकितां । दीपु लागे ॥497॥ अगा विषाचे कांदे वाटुनी । जो रस घेइजे पिळुनी । तया नाम अमृत ठेउनी । जैसें अमर होणें ॥498॥ तेविं विषयांचें जें सुख । तें केवळ परम दुःख । परि काय कीजे मूर्ख । न सेवितां न सरे ॥499॥ कां शीस खांडुनि आपुलें । पायींचां खतीं बांधिलें । तैसें मृत्युलोकींचें भलें । आहे आघवें ॥500॥ म्हणोनि मृत्युलोकीं सुखाची कहाणी । ऐकिजेल कवणाचां…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण टीम अवांतर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1914 रोजी देवराष्ट्रे (सातारा जिल्हा) येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. 1930 साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली, त्यात त्यांनी भाग घेतला होता. 1932 साली त्यांना पहिला तुरुंगवास घडला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात ते सामील झाले होते. सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीत त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. 1946 साली तेव्हाच्या मुंबई प्रांताच्या विधिमंडळाची निवडणूक होऊन यशवंतराव चव्हाण दक्षिण सातारा मतदार संघातून निवडले गेले आणि संसदीय चिटणीस झाले. 1948 साली त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या चिटणीसपदावर नियुक्ती झाली तर…

Read More

रेवती निलेश पांडे पंचवीस-एक वर्षांपूर्वी जवळपास सगळ्यांच्याच उन्हाळ्याच्या सुट्ट्या नातेवाईकांकडे जायच्या. काका, मामा, मावशी यांच्याकडे आम्ही अगदी महिना-महिनाभर राहायचो किंवा चुलत भावंडं आमच्याकडे यायची. तेव्हा कुठे मोबाइल होते? टीव्हीवरही फक्त ‘दूरदर्शन’च दिसायचं. मग मनोरंजनासाठी काय होतं? तर फक्त गोष्टी! आत्ताच्या लहान मुलांना कदाचित हे फार कंटाळवाणं वाटेल, पण आम्हाला गोष्ट ऐकताना खूप भारी वाटायचं. गोष्ट सांगणं ही सुद्धा एक कलाच होती आणि तेव्हा ती बऱ्याच लोकांना अवगत होती. आमचे एक मामा आजोबा नेहमीच उलट्या पायाच्या हडळीची गोष्ट सांगायचे; आजी शकुंतलेची, रामाची, कृष्णाची गोष्ट सांगायची. एक ज्योती आत्या होती, ती नेहमी राजकुमार आणि राजकुमारीची गोष्ट सांगायची. सारख्याच धाटणीच्या वेगवेगळ्या गोष्टी असायच्या.…

Read More

माधवी जोशी माहुलकर विदर्भामध्ये फार पूर्वीपासून उन्हाळा आणि कच्चा चिवडा असे समीकरण ठरलेले आहे. तसा हा चिवडा जेव्हा मनात येईल, तेव्हा करता येतो; परंतु उन्हाळ्यात कच्च्या कैरीचा यात वापर केल्यामुळे तो विशेष चवदार लागतो. सध्याच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचे महत्त्व लक्षात घेता हा गॅस न वापरता केलेला कच्चा चिवडा सर्वांची मधल्या वेळेतील भूक भागवण्याकरिता उत्तम पर्याय ठरू शकतो. हा चिवडा खायची एक पद्धत आहे. अगदी भांड्याला लागलेले तिखटमीठ, शेवटचा पोह्यांचा उरलेला चुरा जोपर्यंत चाटून-पुसून खात नाही, तोपर्यंत ते भांडं हातातून सुटू द्यायचं नसतं. ही पद्धत सर्वांनी अनुसरायची असते. बहुतांश लोकांना कच्चा चिवडा कसा करतात ते माहीत असावे, तरीही त्याची रेसिपी देत…

Read More