Author: Team Avaantar

पराग गोडबोले ‘धुरंधर’ चित्रपटाची खूप प्रशंसा ऐकून, नाताळच्या सुट्टीच्या दिवशी सकाळी सव्वानऊच्या खेळाला पोहोचलो… डोळे चोळत. सुट्टीचा दिवस आहे… घरापासून मोजून पाच मिनिटांवर असलेल्या चित्रपटगृहाच्या खिडकीवर तिकीट मिळणार नाही, या आशंकेने ग्रासलेल्या बायकोने, तब्बल साठ रुपये जास्त मोजून ‘बुक माय शो’वरून तिकीटं काढायला लावली. गेल्यावर बघितलं तर, तिकीट खिडकीवर कोणीही नव्हतं आणि आत तर अर्ध्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्या होत्या! माझ्या मोजूनमापून कोकणस्थ मनाला साठ रुपये हकनाक गेल्याचं दु:ख झालं, पण खूप सुंदर चित्रपट बघायला आलेलो मी, ते गिळलं. नशीब आम्ही दोघेच गेलो होतो. लेक असती तर, अडीच-तीनशे रुपयांचा, मक्याच्या लाह्यांचा आणखी भुर्दंड बसला असता, तो टळला! जाहिराती, नव्या येऊ घातलेल्या…

Read More

अजित गोगटे भारतात प्रवासी आणि मालाची रेल्वेने वाहतूक करण्याचे मक्तेदारी अधिकार केंद्र सरकारकडे आहेत. सरकारनेच 1989 मध्ये केलेल्या रेल्वे कायद्यात प्रवासी आणि मालाची सुरक्षित वाहतूक कशी केली जाईल, याची कायदेशीर चौकट ठरवून सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी स्वत: स्वीकारली आहे. मात्र, भारतात धावणारी प्रत्येक प्रवासी रेल्वेगाडी या चौकटीचे उल्लंघन करून चालविली जात असल्याने भारतीय रेल्वे हा सरकारमान्य मृत्यूचा सापळा आहे, असेच म्हणावे लागेल. रेल्वे कायद्यानुसार प्रत्येक प्रवासी गाडीच्या प्रत्येक डब्याची कमाल प्रवासी क्षमता किती असेल आणि मालगाडीच्या प्रत्येक वाघिणीची माल भरण्याची कमाल क्षमता किती असेल हे ठरविण्याचे बंधन आहे. रेल्वे प्रशासनाला ही कमाल क्षमता केंद्र सरकारकडून मंजूर करून घ्यावी लागते. प्रवाशांची आणि…

Read More

डॉ. किशोर महाबळ सर्व विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. शाळेतील त्यांचे अध्यापन, विद्यार्थ्यांशी वर्तणूक, विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता ओळखण्याची क्षमता, विद्यार्थ्यांच्या विकासातील योगदान, शिक्षणाबद्दल तसेच शिक्षकांच्या भूमिकेबद्दलचे विचार, वर्गातील आणि शाळेतील वर्तन, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, बौद्धिक क्षमता आणि शैक्षणिक गुणवत्ता या सर्व बाबीं शिक्षकांची शैक्षणिक व्यवस्थेतील भूमिका निर्धारित करतात. शिक्षकाचा हा दृष्टिकोन जर नकारात्मक असेल तर, तो वर्ग घेण्यात टाळाटाळ करेल, फक्त परीक्षेपुरते शिकवेल. अभ्यास करणे टाळेल. विद्यार्थ्यांना मारहाण करणे, हा शिस्त लावण्याचा एकमेव मार्ग आहे, असे मानेल. विद्यार्थ्यांमधील गुण शोधण्याऐवजी त्यांच्यावर टीका करण्यात समाधान मानेल. असा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचे अत्यंत नुकसानच करेल. शिक्षणव्यवस्था डबघाईला नेईल. सकारात्मक दृष्टिकोन असलेला…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. डिसेंबर हा महिना माझ्या वाढदिवसाचा. मला माझ्या वाढदिवसाचं कायमच अप्रूप वाटत आलं आहे. तसं पाहिलं तर, सगळ्यांनाच असतं. आमच्याकडे पहिली 5 वर्षं वाडी भरून वाढदिवस साजरे करायची पद्धत आहे. त्यानंतर कधी सेलिब्रेशन केल्याचं आठवणीत नाही. कोणी शुभेच्छा दिल्याचं सुद्धा आठवणीत नाही. थोडं मोठं झाल्यावर कॉलेजमध्ये, नाटक किंवा शूटच्या ठिकाणी कोणी ना कोणी शुभेच्छा द्यायचे. पण हे व्हॉट्सॲप, फेसबुक आल्यापासून कोण कोण आणि कितीजण वाढदिवसाला शुभेच्छा देतात, भेटवस्तू मिळतात… सगळा आनंद आणि खूप मज्जा वाटते! हेही वाचा – बारीक व्हायचंय? तर मग… जसं मला कोणी शुभेच्छा दिलेल्या आवडतात, तसं मला इतरांना शुभेच्छा…

Read More

डॉ. सारिका जोगळेकर होमिओपॅथिक तज्ज्ञ मानवी शरीरात घडणाऱ्या जैविक प्रक्रियांपैकी पचनक्रिया ही सर्वात सूक्ष्म, परंतु अत्यंत महत्त्वाची असते. आपण जे अन्न खातो त्यातून शरीराला ऊर्जा, पोषकद्रव्ये आणि वाढीसाठी आवश्यक घटक मिळवण्याचे काम ही प्रक्रिया अखंडपणे पार पाडते. खाण्यानंतर पचनाची प्रक्रिया आपल्या तोंडापासून सुरू होते. जेव्हा आपण अन्न खातो, तेव्हा आपल्या तोंडातील लाळ अन्नासोबत मिसळते. लाळेमध्ये काही एन्जाईम्स असतात जे अन्नातील कार्बोहायड्रेटचे विघटन सुरू करून पचनाची प्रक्रिया सुरू करतात. तोंडातील चवीची अनुभूती देखील पचनास मदत करते, कारण चव ओळखल्यानंतर शरीरात पचनासाठी आवश्यक रसायने तयार होतात. अन्न जितकं व्यवस्थित चावले जाते, तितकं पुढील अवयवांचा अन्न पचवण्याचा ताण कमी होतो आणि म्हणून जास्त…

Read More

अजित गोगटे पुण्यातील एका इसमाने 27 वर्षांपूर्वी केलेल्या, परंतु कायद्याच्या दृष्टीने सिद्ध होऊ न शकलेल्या पहिल्या लग्नाचे गूढ कथानक आज मी सांगणार आहे. पहिल्या लग्नाची पत्नी हयात असूनही आणि तिला रीतसर घटस्फोट न देता आणखी एका स्त्रीशी फसवणुकीने विवाह करणे हे भारतीय दंड विधांनाच्या (Indian Penal Code) 494 आणि 495 या कलमान्वये गुन्हे आहेत. त्यासाठी अनुक्रमे सात आणि 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा आहे. या गुन्ह्यांसाठी या इसमाविरुद्ध दाखल खटल्याने या कथानकाची सुरुवात होते आणि अपिलात हायकोर्टाने त्याला निर्दोष सोडण्यात सांगता होते. या कथानकास गूढ म्हणण्याचे कारण असे की, त्यात दोन समांतर शक्यता तुल्यबळ संभाव्यतेने दिसतात. एक म्हणजे, दुसरे लग्न करण्याआधी…

Read More

गजानन देवधर स्कॉटलंडच्या हायलंड भागातील Cairngorms National Park मध्ये वसलेलं न्यूटनमोर हे छोटंसं पण मोहक खेडं आम्ही 2015 साली पाहिलं. आम्ही दोघं, सोबत माझा धाकटा भाऊ दीपक आणि भावजय ज्योती, चौघांनी मिळून या गावात दोन दिवस घालवले. दुपारी साधारण 12 वाजता आम्ही एडिंबरोहून कारने न्यूटनमोरला पोहोचलो. स्कॉटलंडच्या केंद्रस्थानी असलेलं जेमतेम हजार लोकवस्तीचं हे गाव. तिथं राहण्यासाठी निवडलेला आमचा Eagle’s View हा होम स्टे अगदी गावाच्या वेशीजवळच होता. Eagle’s View हा छोटेखानी बंगला अजूनही आमच्या छान लक्षात आहे, तो त्याच्या लाकडी सजावट, आजूबाजूचं शांत वातावरण आणि उबदार आदरातिथ्य यामुळे! प्रवासाची सुरुवातच मनात आपलेपणाची भावना मनात निर्माण झाली. दुपारनंतर बाहेर पडून, Eagle’s…

Read More

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर काय हे मन… मन… ‘मन म्हणजे फक्त डोक्यातील गुंतागुंतीचा गोंधळ आहे. खरं विज्ञान हे फक्त दिसणारं आणि मोजता येणारं असावं… आणि माणसात जे दिसतं-अनुभवता येतं ते म्हणजे वर्तन!’ तो येता-जाता नेहमी हे वाक्य बोलत असे… तो म्हणजे एकेकाळी अमेरिकेत एक प्रचंड हुशार, पण तितकाच हट्टी असलेला एक मानसशास्त्रज्ञ! याचं गुपित कदाचित त्याच्या बालपणात दडलं होतं; फक्त 13 वर्षांचा असताना त्याच्या बाबानं कुटुंब सोडून दिलं, यामुळं तो आयुष्यभर नात्यांबद्दल थोडासा कठोर आणि थंड राहिला… बहुदा म्हणूनच त्याच्या मानसशास्त्रात, मनोविश्लेषणात भावभावनांना फारसं स्थान नाही; महत्त्वाचं आहे ते फक्त वर्तन! त्याची आई अतिशय ‘धार्मिक’ होती आणि आपल्या मुलानं पाद्री बनून…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. माझ्या आयुष्यात एक बाई आली, ‘मोठा मम्मी’! थोडंस वेगळं नाव. एका मराठी सिनेमाचं शूट करत होते… नगर जिल्ह्यातील एका खेडे गावात. एकंदरीत सगळ प्रकरण ‘धन्यवाद’ होतं. नावाजलेले दिग्दर्शक असूनही खूप वाईट पद्धतीने काम चाललेलं. बरं, प्रोड्युसरची वांग्याची शेती होती. त्याने हॉटेलवर पोतभर वांगी आणून ठेवली होती. सकाळ, संध्याकाळी फक्त वांग्याची भाजी! चला, मला वांगी आवडतातच. पण तिथला आचारी म्हणजे वांग्याचं ‘होळकं’ बनवायचा. ते तिखट जेवण मी अजिबात खाऊ शकत नव्हते… दुसर तिथे काहीच मिळत नव्हतं! तिथे मुंबईहून एक थोड्या वयस्कर बाई आल्या होत्या… उंच, धिप्पाड, गोऱ्यापान, सुंदर आणि हसतमुख. अर्थात, मी…

Read More

दिलीप कजगांवकर मागच्याच आठवड्यात आबासाहेब आणि आईंच्या लग्नाचा 51वा वाढदिवस राज आणि नेहाने मोठ्या उत्साहात साजरा केला. दुसऱ्या दिवशी नेहा आणि तिची दोन्ही मुले, नेहाच्या माहेरी गेली. राजने आई-बाबांना मॉलमध्ये नेले, त्यांच्यासाठी कपडे, बुट, चपला, चष्मा एवढेच काय अगदी टुथब्रश आणि कंगवे देखील खरेदी केले. छानशा हॉटेलमध्ये जेवण… मराठी सिनेमा, संध्याकाळी बागेतील फेरफटका, पाणीपुरी, भेळ, आईस्क्रीम आणि त्यानंतर ते घरी परतले. एकंदरीत दिवस खूपच छान गेला. “राज किती खर्च करतोस आमच्यावर?” न राहवून आई-बाबांनी विचारले. “दोन दिवस आपल्याला पाचगणी-महाबळेश्वरला जायचेय आणि त्यानंतर साताऱ्याला…” राजने त्याचा प्लॅन आई-बाबांना सांगितला. पुढील दोन दिवस राज आणि आई-बाबा पाचगणी-महाबळेश्वरला मनसोक्त भटकले. रात्री न आईने…

Read More