Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»आजींनी नव्या तरुणाईचे टोचले कान
    ललित

    आजींनी नव्या तरुणाईचे टोचले कान

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 6, 2026Updated:March 17, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीसाहित्य, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, गावातील लग्नकार्य, आधुनिक मुलींची विचारसरणी, दागिन्यांचे महत्त्व, दागिन्यांमागील विज्ञान, दागिन्यांमागील वैज्ञानिक कारण, दागिने आणि शरीरशास्त्र, दागिने आणि आरोग्य,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    प्रणाली मंगेश महाशब्दे

    आज गावी एका लग्नाला जाण्याचा योग आला. खूप दिवसांनी असे लग्न होत होते… असे म्हणजे सर्व विधीपूर्वक!

    तुम्ही म्हणाल की, सगळी लग्नं तशीच होतात की! पण खरंच गावाकडील हे लग्न अनेक गोष्टींनी लक्षात राहिले..

    सगळे गाव एक होऊन लग्नाची तयारी करीत होते. घरचंच कार्य असल्यासारखे लहान-मोठे सर्वजण आपापला सहभाग देत होते. कोणताही बडेजाव तेथे नव्हता. कोणतेही प्री-वेडिंग कार्यक्रम तेथे नव्हते. पण सगळेजण खूपच आनंदात होते. मुलीकडील लग्न म्हणजे गावात वऱ्हाड येणार होते. वेशीपासून गावात दुतर्फा कमान घातली होती, रांगोळ्या काढल्या होत्या. गावातील सर्व पुरूष मंडळी ही सगळी बाहेरची कामे बघत होती तर महिला मंडळ सगळे लेकीचे कौतुक करण्यात मग्न होती. (गावात समानतेचे वारे जास्त वाहत नाहीत.)

    नवऱ्या मुलीबरोबर तिच्या मैत्रिणी तसेच इतर मुलींना आजी सगळ्या विधींबद्दल माहिती देत, गप्पा मारत काम करत होत्या. नवरी मुलगी कॅालेजमध्ये शिकायला शहरात काही दिवस होती, त्यामुळे तिच्या तेथील मैत्रिणी पण लग्नाला आल्या होत्या. एकूणच तेथील सगळा कार्यक्रम त्यांना गोंधळच वाटत होता. त्यामुळे त्या सारख्याच त्या कार्यक्रमांना, दागिन्यांना, पेहेरावाला नावे ठेवत होत्या. गावातील सर्व आजी त्या मुलींसाठी फक्त हसण्याचा विषय होता…

    हेही वाचा – मनाचे ऐश्वर्य संस्कार, मनाचे सौन्दर्य संस्कार

    त्या मुली तर त्या आजींना म्हणाल्या पण की, बायका किती शिकत आहेत, मोठमोठ्या पदांवर काम करत आहेत आणि तुम्ही हे काय घालत आहात आणि सगळ्यांना तसे घालायला पण का सांगत आहात? त्या आजींनी काही वेळ सगळे ऐकून घेतले नंतर मात्र त्यांनी सगळ्या मुलींना एका ठिकाणी बसवून गप्पा मारायला सुरुवात केली.

    “काय ग पोरींनो काय म्हणत व्हता तुम्ही की, मुली शिकून लय मोठ्या झाल्या मग आता हे असे सगळे दागिने, असे कपडे कशापायी? बरोबर ना?”

    मुली – मग काय तर उगीचच हे एवढे जड-जड दागिने, अवघडल्यासारखे कपडे कशाला हवे? साधं सोपं रहावं…

    आजी – अगं पोरींनो हे दागिनं म्हणजी कुठलेही अवघड काम कसं असेल?

    मुली – मग काय तर कशाला घालायचे हे दागिने? कशाला एवढी खरेदी करायची दागिन्यांची?

    आजी – अगदी बरोबर हाय बघा पोरींनो तुमचं. पण एक सांगा बरं ह्ये दागिनं, ह्यो गजरा, ह्ये कुकू कशापायी लावतो असं वाटतं तुम्हास्नी?

    मुली – पहिल्यापासून करत आला आहात, तुमच्या आजी-पणजी हे करत होत्या म्हणून तुम्हीपण करत आहात. बाकी काय. तुम्हाला कधी हे नको, असे सांगताच आले नाही. आमच्या आई-आजी कशा या सगळ्या गोष्टींना विरोध करतात.

    आजी – अस्सं हाय व्हय, मला सांगा तुम्ही समद्याजणींनी हे असे समदे दागिने तुमच्या आईने, आजीने घातलेले कधी बघितले आहे का?

    मुली – नाही.

    आजी – तुमच्या आई आणि आजीला सारखं काहीना काही दुखतं का?

    मुली – कधी-कधी.

    आजी – बरं मग, आता आम्ही काय सांगतो ते नीट ऐका आणि तुमच्या घरी बी सांगा. काय चालंल न्हवं? आता बघा, आम्ही हे सोन्याचे दागिने जे घातले हाय ते समदे शरीराच्या वरच्या भागात आणि चांदीचे दागिने शरीराच्या खालच्या भागात. बरोबर ना!

    मुली – असं का?

    दुसरी आजी – सोन्याचे दागिने उष्ण आणि चांदीचे दागिने थंड असतात. कंबरेच्या वरील भागात सोन्याचे दागिने आणि कंबरेच्या खालील भागात चांदीचे दागिने घातले पाहिजेत. हा नियम पाळल्याने शरीरातील उष्णता आणि थंडावा नीट राहतो.

    हेही वाचा – अबोला… जास्त किंवा कमी दोन्ही घातकच!

    तिसरी आजी – सोन्याच्या दागिन्यांमुळे शरीराचे तापमान आणि रक्ताभिसरण नियंत्रित रहाते, ताण आणि चिंता कमी करते. तर चांदीच्या दागिन्यांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

    दुसरी आजी – आता ही नथ. नाकात नथ घातल्याने मासिक पाळीच्या समस्या दूर होतात. शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होते.

    तिसरी आजी – या बांगड्या घासल्या जातात त्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. तुमच्या भाषेत सांगायचे तर त्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते.

    दुसरी आजी – पायांमध्ये ही जोडवी, त्यामुळे रक्तवाहिनीवर दाब निर्माण होतो. त्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीतपणे सुरू राहतो. या प्रकारे, जोडवी स्त्रियांची गर्भधारणा क्षमता निरोगी ठेवते आणि मासिक पाळी ही नियमित होते. तर, चांदीच्या पैंजणांमुळे पायाचे घर्षण होऊन पायाची हाडं मजबूत होतात.”

    पहिली आजी – हे आम्ही काहीच दागिन्याबद्दल सांगितले. बाकीची माहिती तुम्ही तुमच्या या मोबाइलमध्ये पण बघू शकाल. आता फक्त तुम्ही पोरी लग्न झाल्यावर हे सगळे घालायला लागा अन् मग बगा काय व्हते ते.

    दुसरी आजी – तुमच्या मोबाईलवर 16 शृंगार लिहून बघा, मग समजेल काय महत्त्व आहे ते! तुम्हाला आमी सांगितले तर, ते पटत बी न्हायी की…”

    मुली – खरंच की, हे सगळे आहे की मोबाइलमध्ये! बापरे, केवढ्या गोष्टी माहीत आहेत या सर्वांना!! आजी आम्हाला पण पटले हे सगळे आपल्या betterment साठीच आहे पण आम्हीच त्याला outdated म्हणत होतो. पण आता आम्हीपण हे सगळे घालणार आणि इतरांना पण घालायला सांगणार.

    असे म्हणून सगळेच हसत हसत परत कामाला लागले.

    मोबाइल – 9730020494

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn