Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»अध्यात्म»Dnyaneshwari : आग लागो या युद्धाला…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : आग लागो या युद्धाला…

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 11, 2025Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Nine, नववा अध्याय, अध्याय नववा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.

    अध्याय पहिला

    हे आदिपुरुषाची माया । ब्रह्मेयाहि नयेचि आया । म्हणऊनी भुलविला ऐकें राया । संजयो म्हणे ॥203॥ अवधारीं मग तो अर्जुनु । देखोनि सकळ स्वजनु । विसरला अभिमानु । संग्रामींचा ॥204॥ कैसी नेणों सदयता । उपनली येथे चित्ता । मग म्हणे कृष्णा आता । नसिजे एथ ॥205॥ माझें अतिशय मन व्याकुळ । होतसे वाचा बरळ । जे वधावे हे सकळ । येणें नांवें ॥206॥

    निमितानि च पश्यामि विपरीतानि केशव । न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥31॥

    या कौरवां जरी वधावें । तरी युधिष्ठिरादिक कां न वधावे । हे येरयेर आघवे । गोत्रज आमुचे ॥207॥ म्हणोनि जळो हें झुंज । प्रत्यया न ये मज । एणें काय काज । महापापें ॥208॥ देवा बहुतीं परीं पाहतां । एथ वोखटें होईल झुंजतां । वर कांहीं चुकवितां । लाभु आथी ॥209॥

    न काङक्षे विजयं कृष्ण न च राज्य सुखानि च । किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ॥32॥ येषामर्थे काङक्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च । ते इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ॥33॥

    तया विजयवृत्ती कांही । मज सर्वथा काज नाहीं । एथ राज्य तरी कायी । हें पाहुनियां ॥210॥ यां सकळांतें वधावें । मग जे भोग भोगावे । ते जळोत आघवे । पार्थु म्हणे ॥211॥ तेणें सुखेविण होईल । तें भलतेही साहिजेल । वरि जीवितही वेंचिजेल । याचिलागीं ॥212॥ परी यासी घातु कीजे । मग आपण राज्य भोगिजे । हें स्वप्नींही मन माझें । करूं न शके ॥213॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : इष्टमित्र आपुले । कुमरजन देखिले…

    अर्थ

    संजय म्हणाला, हे (धृतराष्ट्र) राजा, ऐक. हा स्नेह म्हणजे परमात्म्याची माया आहे. ही ब्रह्मदेवालाही आकळत नाही; म्हणून (त्याने) अर्जुनाला भुरळ पाडली. ॥203॥ राजा ऐक. मग तो अर्जुन (युद्धाला आलेले) सर्व आपलेच लोक आहेत असे पाहून, लढाईचा अभिमान (ईर्षा) विसरून गेला. ॥204॥ तेथे त्याच्या चित्तात सदयता कोठून उत्पन्न झाली कोण जाणे! मग म्हणाला, कृष्णा, आपण आता येथे राहू नये, हे बरे. ॥205॥ या सर्वांस मारावयाचे हे मनात येताच त्याने माझे मन अतिशय व्याकुळ होते आणि तोंड हवे ते बरळू लागते. ॥206॥

    हे केशवा! मला विपरीत लक्षणे दिसत आहेत; आणि युद्धामध्ये स्वजनांना मारले असता कोणतेही श्रेय (प्राप्त होईल असे) मला दिसत नाही. ॥31॥

    या कौरवांचा वध करणे जर योग्य असेल, तर धर्मराजादिकांचा वध करण्याला काय हरकत आहे? कारण की, हे सर्व आम्ही एकमेकांचे नातलगच आहोत. ॥207॥ याकरिता आग लागो या युद्धाला! मला हे पसंत नाही. या महापापाची आम्हास काय गरज आहे? ॥208॥ देवा! अनेक दृष्टींनी विचार केला असता (असे वाटते की), यावेळी युद्ध केले, तर (त्याचा परिणाम) वाईट होईल; पण ते जर टाळले तर काही लाभ होईल. ॥209॥

    कृष्णा, मला विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही आणि सुखाचीही नाही. हे गोविंदा, आम्हाला राज्य मिळून काय उपयोग? सुखोपभोग मिळून तरी काय उपयोग? अथवा आम्हाला जगून तरी काय उपयोग? ॥32॥ जांच्याकरिता आम्हाला राज्याची, भोगांची अथवा सुखांची इच्छा असावयाची, ते हे या युद्धामध्ये स्वत:चे प्राण आणि धन यांचा त्याग करून उभे आहेत. ॥33॥

    त्या विजयाच्या इच्छेशी मला काहीच कर्तव्य नाही; अशा रीतीने मिळविलेले राज्य तरी आपल्याला काय करावयचे? ॥210॥ अर्जुन म्हणाला, या सर्वाना मारून जे भोग भोगावयाचे, त्या सगळ्यांना आग लागो! ॥211॥ त्या भोगांपासून मिळणाऱ्या सुखाच्या अभावी, जो प्रसंग येऊन पडेल, तो वाटेल तसा बिकट असेल तरीही सहन करता येईल. इतकेच काय? यांच्याकरिता आमचे प्राण खर्ची पडले तरी चालेल; ॥212॥ पण यांचे प्राण घ्यावे आणि आपण राज्य भोगावे, ही गोष्ट माझे मन स्वप्नातदेखील करू शकणार नाही. ॥213॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : देखें देह कांपत । तोंड असे कोरडें होत…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : आतां आपुलेनि कृपाप्रसादें, मिया भगवद्‍गीता वोवीप्रबंधें…

    March 16, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : चंदनातें कायसेनि चर्चावें, अमृतातें केउतें रांधावें…

    March 15, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    By Team AvaantarMarch 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा आतां शब्दब्रह्मीं असंख्याके । जेतुला कांहीं अभिप्राय पिके । तेतुला महाभारतें…

    Dnyaneshwari : आतां आपुलेनि कृपाप्रसादें, मिया भगवद्‍गीता वोवीप्रबंधें…

    March 16, 2026

    Dnyaneshwari : चंदनातें कायसेनि चर्चावें, अमृतातें केउतें रांधावें…

    March 15, 2026

    Dnyaneshwari : अर्धोन्मीलित डोळे, वर्षताति आनंदजळें…

    March 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn